शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

coronavirus: कोरोना अहवाल येण्यापूर्वीच जाताहेत रुग्णांचे प्राण, तीन ते पाच दिवसांचा लागतो कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:27 AM

खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने चाचण्या करणाऱ्या लॅबवरील कामाचा ताण कमालीचा वाढल्याने रिपोर्ट येण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत असून काही प्रकरणांत रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे.खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील खाजगी लॅबवरील ताणही वाढत असून कमी मनुष्यबळात त्यांना कामे करावी लागत आहेत. शासनाने निश्चित केलेले दर खाजगी लॅबकडून आकारले जात आहेत.महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याचे आवाहन केले आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही आणि चाचणीचा अहवाल लवकर मिळत नाही. शहरातील एकही खाजगी रुग्णालय कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असल्याखेरीज संशयित रुग्णाला दाखल करून घेत नाही. अन्य रुग्णालये तर संशयित रुग्णाला उभेही करीत नाहीत. पाच दिवस कोरोनाची लक्षणे दिसूनही त्यांना उपचार न मिळाल्यामुळे काहींचे मृत्यू झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अशा एका रुग्णाचा मृत्यू झाला. १ जुलै रोजी त्याने कोरोना चाचणी केली होती. परंतु, त्यानंतर त्याला अधिकचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात हलविण्यासाठी नातेवाईकांनी धावपळकेली. परंतु, त्याच्याकडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्याने एकाही रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. त्याचा रिक्षातच तडफडून मृत्यू झाला.शहरात असलेल्या एका मोठ्या लॅबमध्ये दिवसाला एक हजारांच्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. इतर लॅबमधील हे प्रमाण दिवसाला १०० ते २०० इतके आहे. परंतु, या ठिकाणीदेखील कामाचा ताण अधिक असल्याने एक ते दोन दिवसांत अहवाल रुग्णाला दिला जात आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने काही लॅबने कोणी काम करण्यास इच्छुक असेल, तर त्यांच्यासाठी प्रतिदिन एक हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. काही कर्मचारी घरी जाऊन तपासणी करण्याला घाबरत आहेत, तर काही घरी रुग्ण आढळल्याचे कारण देऊन कामावर येत नाहीत. त्यामुळे जे मनुष्यबळ आहे, त्यावरच काम करण्याची वेळ या लॅबवर आली आहे. त्यामुळेदेखील अहवालास विलंब होत आहे.डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोरोना चाचणी केली जात नव्हती. आता नव्या नियमानुसार एखाद्याला कोरोनाची काही लक्षणे दिसत असतील, तर तो तसे सांगून चाचणी करून घेऊ शकतो, असे खाजगी लॅबचालकांनी स्पष्ट केले. परंतु, प्रत्येकाला खाजगी लॅबमध्ये चाचणी शक्य होत नसल्याने तो पालिकेच्या यंत्रणांकडे धाव घेत आहे. त्यांच्याकडून अहवाल येण्यास पाच दिवसांचा कालावधी लागतो परंतु, आम्ही २४ तासांत अहवाल देतो, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.खाजगी लॅबचे दर स्थिरराज्य शासनाने कोरोना चाचणीकरिता खाजगी लॅबसाठी जे दर निश्चित केले आहेत, त्यानुसारच २८०० रुपये ठाण्यात आकारले जातात. जरी घरी जाऊन स्वॅब घेतला, तरी त्यासाठी तेवढेच पैसे आकारले जात आहेत. रुग्णालयातून रुग्णांचा स्वॅब आल्यास त्यासाठी २२०० रुपये आकारले जातात. मात्र, ठाण्यात टोकनपद्धतीचा अवलंब केला जात नाही.आमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. परंतु, उपलब्ध मनुष्यबळावर आम्ही काम करून रुग्णाला लवकरात लवकर म्हणजे २४ तासांत चाचणी अहवाल देण्याचा प्रयत्न करीत आहोत.- सचिन भोळे, खाजगी लॅबचालककामाचा ताण आहेच, परंतु आम्ही २४ तासांत रुग्णांना चाचणी अहवाल देत आहोत. आमच्याकडे दिवसाला १०० ते २०० कोरोना चाचण्या होत आहेत.- उल्हास वैद्य,खाजगी लॅबचालकखाजगी लॅबचालकांसाठी दर निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यानुसारच ते दर आकारत आहेत. लवकरात लवक र अहवाल दिले जावेत, असे सांगण्यात आले आहे.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे