शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

coronavirus: कोरोना अहवाल येण्यापूर्वीच जाताहेत रुग्णांचे प्राण, तीन ते पाच दिवसांचा लागतो कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:28 IST

खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने चाचण्या करणाऱ्या लॅबवरील कामाचा ताण कमालीचा वाढल्याने रिपोर्ट येण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत असून काही प्रकरणांत रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे.खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील खाजगी लॅबवरील ताणही वाढत असून कमी मनुष्यबळात त्यांना कामे करावी लागत आहेत. शासनाने निश्चित केलेले दर खाजगी लॅबकडून आकारले जात आहेत.महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याचे आवाहन केले आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही आणि चाचणीचा अहवाल लवकर मिळत नाही. शहरातील एकही खाजगी रुग्णालय कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असल्याखेरीज संशयित रुग्णाला दाखल करून घेत नाही. अन्य रुग्णालये तर संशयित रुग्णाला उभेही करीत नाहीत. पाच दिवस कोरोनाची लक्षणे दिसूनही त्यांना उपचार न मिळाल्यामुळे काहींचे मृत्यू झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अशा एका रुग्णाचा मृत्यू झाला. १ जुलै रोजी त्याने कोरोना चाचणी केली होती. परंतु, त्यानंतर त्याला अधिकचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात हलविण्यासाठी नातेवाईकांनी धावपळकेली. परंतु, त्याच्याकडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्याने एकाही रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. त्याचा रिक्षातच तडफडून मृत्यू झाला.शहरात असलेल्या एका मोठ्या लॅबमध्ये दिवसाला एक हजारांच्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. इतर लॅबमधील हे प्रमाण दिवसाला १०० ते २०० इतके आहे. परंतु, या ठिकाणीदेखील कामाचा ताण अधिक असल्याने एक ते दोन दिवसांत अहवाल रुग्णाला दिला जात आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने काही लॅबने कोणी काम करण्यास इच्छुक असेल, तर त्यांच्यासाठी प्रतिदिन एक हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. काही कर्मचारी घरी जाऊन तपासणी करण्याला घाबरत आहेत, तर काही घरी रुग्ण आढळल्याचे कारण देऊन कामावर येत नाहीत. त्यामुळे जे मनुष्यबळ आहे, त्यावरच काम करण्याची वेळ या लॅबवर आली आहे. त्यामुळेदेखील अहवालास विलंब होत आहे.डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोरोना चाचणी केली जात नव्हती. आता नव्या नियमानुसार एखाद्याला कोरोनाची काही लक्षणे दिसत असतील, तर तो तसे सांगून चाचणी करून घेऊ शकतो, असे खाजगी लॅबचालकांनी स्पष्ट केले. परंतु, प्रत्येकाला खाजगी लॅबमध्ये चाचणी शक्य होत नसल्याने तो पालिकेच्या यंत्रणांकडे धाव घेत आहे. त्यांच्याकडून अहवाल येण्यास पाच दिवसांचा कालावधी लागतो परंतु, आम्ही २४ तासांत अहवाल देतो, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.खाजगी लॅबचे दर स्थिरराज्य शासनाने कोरोना चाचणीकरिता खाजगी लॅबसाठी जे दर निश्चित केले आहेत, त्यानुसारच २८०० रुपये ठाण्यात आकारले जातात. जरी घरी जाऊन स्वॅब घेतला, तरी त्यासाठी तेवढेच पैसे आकारले जात आहेत. रुग्णालयातून रुग्णांचा स्वॅब आल्यास त्यासाठी २२०० रुपये आकारले जातात. मात्र, ठाण्यात टोकनपद्धतीचा अवलंब केला जात नाही.आमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. परंतु, उपलब्ध मनुष्यबळावर आम्ही काम करून रुग्णाला लवकरात लवकर म्हणजे २४ तासांत चाचणी अहवाल देण्याचा प्रयत्न करीत आहोत.- सचिन भोळे, खाजगी लॅबचालककामाचा ताण आहेच, परंतु आम्ही २४ तासांत रुग्णांना चाचणी अहवाल देत आहोत. आमच्याकडे दिवसाला १०० ते २०० कोरोना चाचण्या होत आहेत.- उल्हास वैद्य,खाजगी लॅबचालकखाजगी लॅबचालकांसाठी दर निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यानुसारच ते दर आकारत आहेत. लवकरात लवक र अहवाल दिले जावेत, असे सांगण्यात आले आहे.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे