शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 00:24 IST

सर्वच स्थानकांवर पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : अडीच महिन्यांनी प्रथमच सुटली डहाणूहून मुंबईसाठी गाडी, दळणवळण काही रुळांवर

पालघर/बोर्डी : लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अडीच महिन्यांनी डहाणूहून मुंबईकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ५ वाजता धावली तर डहाणू आगारानेही दिवसाला दोन एस.टी. गाड्यांची सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली आहे. त्यामुळे डहाणू ते मुंबई दरम्यानचे दळणवळण काही अंशी पुन्हा रुळावर आले असले तरी पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद दिसला. दरम्यान, प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दळणवळण व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामध्ये लोकल सेवेचाही समावेश होता. नंतरच्या काळात लॉकडाऊन शिथिल केल्यावर गरजेनुसार काही प्रवासी साधनांना बंदीतून सूट देण्यात आली. मात्र लोकल सेवा सुरू झाली नव्हती. त्यासाठी जिल्ह्यातून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाºया नोकरदारांना स्वत:चे वाहन किंवा पालघर येथून सोडण्यात येणाºया एस.टी.चा आधार घ्यावा लागत होता.दरम्यान, अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवार १५ जूनपासून पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवा बजावणाºया बारा विभागातील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा उपलब्ध केली आहे. त्यानुसार डहाणू रोडहून मुंबईकडे जाणाºया आठ आणि मुंबईहून या स्थानकात येणाºया आठ अशा एकूण सोळा लोकल धावणार आहेत. त्याचे वेळापत्रक आणि या सेवेचा कोणाला लाभ घेता येणार आहे, त्यांना आवश्यक कागदपत्रे व नियमावलींची माहिती उपलब्ध केली आहे. डहाणूहून सोमवारी पहाटे ५ वाजता पहिली लोकल मुंबईच्या दिशेने धावली. त्यामध्ये केवळ एका प्रवाशाने प्रवास केला. ७.०५ वाजताच्या दुसºया लोकलमध्ये दोन प्रवासी, तर ९.३५ च्या तिसºया लोकलला पाच ते सहा प्रवाशी संख्या होती. या सर्व लोकल गाड्यांनी पूर्वीप्रमाणेच डहाणू रोड, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे, सफाळे, वैतरणा आणि विरार या स्थानकात थांबा घेतला. परंतु कमी प्रवासी संख्येची परिस्थिती पालघर आणि अन्य स्थानकादरम्यान दिसून आली. अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी वसई, मुंबई आणि उपनगरात जाणाºया नोकरदारांनी खाजगी वाहने भाडेतत्त्वावर घेतल्याने लोकलमधील प्रवाशी संख्या कमी असून काही दिवसात ती वाढेल असे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.दरम्यान, दुसºया टप्प्यात बँक, बांधकाम यासह अन्य क्षेत्रातील नोकरदारांना संधी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.डोंबिवलीमधून सुटल्या ४०० ऐवजी २१० लालपरीडोंबिवली : लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाºयांकरिता असतानाही सोमवारी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकातून २१० बसगाड्या सोडण्यात आल्या. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ४०० च्या आसपास बसगाड्या सोडण्यात येत होत्या.लोकल सुरूझाल्याचे निमित्त करून बस कमी केल्याचा सर्वाधिक फटका खासगी कंपन्यांमधील कर्मचाºयांना बसला. मंत्रालय, ठाणे, बदलापूर, सायन, जेजे मार्गावर या बस सोडल्या. काहींनी लोकल मिळेल, याची शाश्वती नसल्याने बसने जाणे पसंत केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlocalलोकलcentral railwayमध्य रेल्वे