शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 00:24 IST

सर्वच स्थानकांवर पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : अडीच महिन्यांनी प्रथमच सुटली डहाणूहून मुंबईसाठी गाडी, दळणवळण काही रुळांवर

पालघर/बोर्डी : लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अडीच महिन्यांनी डहाणूहून मुंबईकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ५ वाजता धावली तर डहाणू आगारानेही दिवसाला दोन एस.टी. गाड्यांची सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली आहे. त्यामुळे डहाणू ते मुंबई दरम्यानचे दळणवळण काही अंशी पुन्हा रुळावर आले असले तरी पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद दिसला. दरम्यान, प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दळणवळण व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामध्ये लोकल सेवेचाही समावेश होता. नंतरच्या काळात लॉकडाऊन शिथिल केल्यावर गरजेनुसार काही प्रवासी साधनांना बंदीतून सूट देण्यात आली. मात्र लोकल सेवा सुरू झाली नव्हती. त्यासाठी जिल्ह्यातून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाºया नोकरदारांना स्वत:चे वाहन किंवा पालघर येथून सोडण्यात येणाºया एस.टी.चा आधार घ्यावा लागत होता.दरम्यान, अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवार १५ जूनपासून पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवा बजावणाºया बारा विभागातील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा उपलब्ध केली आहे. त्यानुसार डहाणू रोडहून मुंबईकडे जाणाºया आठ आणि मुंबईहून या स्थानकात येणाºया आठ अशा एकूण सोळा लोकल धावणार आहेत. त्याचे वेळापत्रक आणि या सेवेचा कोणाला लाभ घेता येणार आहे, त्यांना आवश्यक कागदपत्रे व नियमावलींची माहिती उपलब्ध केली आहे. डहाणूहून सोमवारी पहाटे ५ वाजता पहिली लोकल मुंबईच्या दिशेने धावली. त्यामध्ये केवळ एका प्रवाशाने प्रवास केला. ७.०५ वाजताच्या दुसºया लोकलमध्ये दोन प्रवासी, तर ९.३५ च्या तिसºया लोकलला पाच ते सहा प्रवाशी संख्या होती. या सर्व लोकल गाड्यांनी पूर्वीप्रमाणेच डहाणू रोड, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे, सफाळे, वैतरणा आणि विरार या स्थानकात थांबा घेतला. परंतु कमी प्रवासी संख्येची परिस्थिती पालघर आणि अन्य स्थानकादरम्यान दिसून आली. अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी वसई, मुंबई आणि उपनगरात जाणाºया नोकरदारांनी खाजगी वाहने भाडेतत्त्वावर घेतल्याने लोकलमधील प्रवाशी संख्या कमी असून काही दिवसात ती वाढेल असे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.दरम्यान, दुसºया टप्प्यात बँक, बांधकाम यासह अन्य क्षेत्रातील नोकरदारांना संधी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.डोंबिवलीमधून सुटल्या ४०० ऐवजी २१० लालपरीडोंबिवली : लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाºयांकरिता असतानाही सोमवारी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकातून २१० बसगाड्या सोडण्यात आल्या. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ४०० च्या आसपास बसगाड्या सोडण्यात येत होत्या.लोकल सुरूझाल्याचे निमित्त करून बस कमी केल्याचा सर्वाधिक फटका खासगी कंपन्यांमधील कर्मचाºयांना बसला. मंत्रालय, ठाणे, बदलापूर, सायन, जेजे मार्गावर या बस सोडल्या. काहींनी लोकल मिळेल, याची शाश्वती नसल्याने बसने जाणे पसंत केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlocalलोकलcentral railwayमध्य रेल्वे