शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२६० रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 7:54 PM

 ठाणे शहरात ३५२ रुग्ण आज सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ४२ हजार ९७८ रुग्णांची नोंद केली आहे.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी एक हजार २६० रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एक लाख ९८ हजार २६० रुग्ण बाधीत झाल्याची नोंद झाली आहे. तर,३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

 ठाणे शहरात ३५२ रुग्ण आज सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ४२ हजार ९७८ रुग्णांची नोंद केली आहे. तर, सहा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या एक हजार ९२ नोंदवण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली शहरात २०८ रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत मृतांची संख्या ९३८ झाली आहे. तर, बाधीत रुग्ण संख्या ४७ हजार ३५७ झाली आहे. .

 उल्हासनगर शहरात ३० नव्या रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे. या शहरात आता नऊ हजार ७९४ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर आज एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३२२ वर पोहचली आहे. भिवंडी शहर परिसरात ३७ बाधीत आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. येथे आता पाच हजार ६११ बाधीत असून आतापर्यंत ३२७ मृत्यू झाले आहे. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्णांची तर आज पाच मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात २१ हजार १०६ बाधितांसह ६६२ मृत्यू झाले आहेत.

अंबरनाथमध्ये ४३ बाधीत सापडले असून आज दोघां मृताची नोंद झाली आहे..आता बाधितांची संख्या सहा हजार ९३६ असून २५५ मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ३० रुग्णांचा नव्याने शोध लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ८६६ झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झाला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ७४ रुग्ण आज सापडले असून तीन मृत्यू झाले आहेत. या क्षेत्रात १५ हजार ८८२ बाधीत झाले असून मृतांची संख्या ४८५ वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे