शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: स्मशानभूमींना कोरोनाचा विळखा; जवाहरबाग स्मशानभूमीतील दोघांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:42 IST

प्रत्येक कर्मचाऱ्याची मोफत चाचणी करण्यासाठी आयुक्तांना साकडे

ठाणे : ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब शनिवारी उघड झाली. त्यामुळे या कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील सुरक्षारक्षकांना अद्यापही तुटपुंज्या साहित्यावरच काम करावे लागत आहे. त्यांचे पीपीई किट तकलादू असून हॅण्डग्लोव्हजही लवकर जीर्ण होऊन फाटतात. त्यामुळे ठाण्यातील सर्वच स्मशानभूमींतील कर्मचाºयांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.ठाणे शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना जवाहरबाग स्मशानभूमीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांपैकी ८० टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. या ठिकाणच्या कर्मचाºयांनाच या कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यातूनच, आता येथील एका चालकासह अन्य एका कर्मचाºयाला शनिवारी कोरोनाची लागण झाल्याची बाब स्पष्ट झाली. याठिकाणी काम करणाºया कर्मचाºयाला त्रास होत असल्यामुळे त्याने दोन दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या सुरक्षारक्षकांना अद्यापही तुटपुंज्या साहित्यावरच काम करावे लागते. त्यांना दिलेल्या पीपीई किट तकलादू आहेत.हॅण्डग्लोव्हजही लवकर जीर्ण होऊन फाटतात. सॅनिटायझर आणि साबणही त्यांना अपुºया प्रमाणात पुरविले जातात. कोरोनाग्रस्त कर्मचाºयांचे वेतनही ठेकेदाराकडून कपात केले जात आहे. या सर्वच कर्मचाºयांचे वेतन वेळेत आणि विनाकपात दिले जावे. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार घेण्याच्या कालावधीमध्येही त्याला भरपगारी वैद्यकीय सुटी दिली जावी, अशी मागणीही या कर्मचाºयांकडून केली जात आहे.जवाहरबाग स्मशानभूमीत कर्मचाºयांना दिलेल्या किटचा एका बाजूला ढिगारा पडलेला आहे. मागील दीड महिन्यापासून हा ढिगारा उचलला गेलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणाºया पावसामुळे आणखी कोणाला बाधा झाली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक स्मशानभूमीतील कर्मचाºयांची दर १५ दिवसांनी बदली केली जाते. परंतु, त्याचेही दुष्परिणाम होण्याची भीती आहे. बाधा झाल्याचे एखाद्याच्या लक्षातच आले नाही, त्याची अन्यत्र बदली झाल्यानंतर तो इतरांच्या संपर्कात आला, तर कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ शकतो, याकडेही काही कर्मचाºयांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, स्मशानभूमीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोपठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे अध्यक्ष तथा ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष घालून येथील कंत्राटी कर्मचाºयांना सुरक्षेचे कवच द्यावे, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.कर्मचाºयांना तत्काळ सुरक्षा साहित्य देण्याची मागणीशहरातील प्रत्येक स्मशानभूमीमधील कर्मचाºयांची कोरोनाची तत्काळ मोफत चाचणी करावी. त्यांना हॅण्डग्लोव्हज, मास्क, किट आणि इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.स्मशानभूमीतील धुरामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी उल्हासनगर येथील रहिवाशांनीही केल्या होत्या. त्यामुळे स्मशानभूमीतील धूर बाहेर फेकणाºया चिमण्या मोठ्या प्रमाणात असाव्यात, अशीही मागणी या पार्श्वभूमीवर होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या