शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भाईंदरमधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 15:10 IST

मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले .

मीरारोड - महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी भाईंदर मधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवत मीरा भाईंदर मधील अन्य भागात मात्र सम विषम पद्धतीने दुकाने, व्यवसाय उघडण्यास परवानगी दिली आहे . परंतु लॉकडाऊन शिथिल होताच बेजबाबदार लोकांनी खरेदीसाठी गर्दी करून सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊन हटवण्यावरून राजकीय इशारेबाजी करणारे राजकारणी व नगरसेवक कुठे लपले ? असे सवाल जागरूक नागरिक करत आहेत . 

मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . त्यामुळे आयुक्तांनी 1 ते 10 जुलै दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केले . ठाणे , कल्याण आदी जिल्ह्यातील अन्य महापालिकांनी लॉकडाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील 18 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले . 

एकीकडे लॉकडाऊन वाढवले असताना दुसरी कडे मास्क न घालता नाहक फिरणारे , शहरात भाजी - मासळी खरेदीसाठी गर्दी , बेकायदा फेरीवाले व चोरून दुकाने उघडणारे तसेच व्यायामाच्या नावाने बाहेर गर्दी करणारे सतत दिसून आल्याने लॉकडाऊन बाबत प्रशासनासह राजकारणी , नगरसेवक देखील दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले . 

एकीकडे लॉकडाऊन आणि सुरक्षेच्या निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे या बाबत मूग गिळून गप्प बसणाऱ्या बहुतांश नगरसेवक , राजकारण्यांनी दुसरीकडे लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलन करू असे इशारे देत आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरु केले . त्यामुळे आयुक्त लॉकडाऊन बाबत काय भूमिका घेतात या कडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते . 

परंतु आयुक्तांनी भाईंदर मधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले आहे . या 10 हॉटस्पॉट मध्ये भाईंदरचे सरस्वती नगर , साईबाबा नगर , गोडदेव नाका - बाळाराम पाटील मार्ग परिसर , सेना नगर गोडदेव गाव परिसर , खारीगाव - बाळाराम पाटील मार्ग परिसर, शिर्डी नगर , आर एन पी पार्क , मुर्धा रेव आगर , राई शिवनेरी गल्ली 23, पाली सुंदर गल्ली पेट्रोल पंप चौक  या परिसराचा समावेश आहे . 

या हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन काटेकोर पाळला जावा यासाठी पोलीस व पालिका प्रशासन भर देणार आहे . परंतु त्याच बरोबर लॉकडाऊन शिथिल केलेल्या मीरा भाईंदर मधील बहुतांश भागात देखील सुरक्षा निर्देशांची काटेकोर अमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिका व पोलिसांवर आली आहे .

आयुक्तांनी जरी केलेल्या आदेशात मॉल, मार्केट , शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहे . तर बाजारपेठ , भाजी मार्केट , दुकाने हि सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत सम - विषम तत्वावर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे . या शिवाय शासनाच्या पुनश्च हरिओम अभियान अंतर्गत व्यवसाय , कारखाने सुद्धा ठरवून दिलेल्या निर्देशा प्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक