शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ...आटलेले अश्रू कोरोनामुळे पुन्हा दाटले, विद्युतदाहिनीवरील कोरोना योद्धयाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 02:16 IST

कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, ‘साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना,’ तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या एका बहाद्दर कामगाराचे. ख-या कोरोना योद्ध्याचे

- अजित मांडकेठाणे : गेल्या २२ वर्षांत साडेतीन लाखांहून अधिक जणांवर अंत्यविधी केले. नातेवाईकांना रडताना पाहून सुरुवातीला मलाही रडू यायचे. परंतु, तीन-साडेतीन लाख जणांचे अंत्यविधी केल्यानंतर डोळ्यातले अश्रू नाहीसे झाले असे वाटत होते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही डोळ्यात अश्रू येत नव्हते. परंतु, कोरोनाने मात्र कोरड्या पडलेल्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आणले आहेत. कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, ‘साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना,’ तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या एका बहाद्दर कामगाराचे. ख-या कोरोना योद्ध्याचे.जव्हारबाग स्मशानभूमीत काम करणारे जितेंद्र मकवना हे १९९२-९३ मध्ये ठेकेदारी पद्धतीवर मृतदेह जाळण्याचा कामाला लागले. या २२-२३ वर्षांतील त्यांचे प्रमोशन म्हणजे सरणावर जाळणारी मृतदेह आता विद्युत दाहिनीत जाळली जात आहेत. हे काम करताना त्यांचे मन कठोर झाले आहे. मृतांच्या नातेवाइकांचे रडणे ऐकून, त्यांचे दु:ख पाहून जितेंद्र यांचेही दु:ख आणि अश्रू जणू संपले आहेत. हृदय कठोर झाले आहे. हे काम करीत असताना एखादा व्यक्ती मरणे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे ही सामान्य बाब झाली आहे. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हाही त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले नाहीत. परंतु, कोरोनाच्या संकटाने त्यांना बदलून टाकले आहे.200कोरोनाग्रस्तांवर केले अंत्यसंस्कारठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावल्याने त्याचा अंत्यविधी याच स्मशानभूमीत करण्यात आला. १८ एप्रिलला एका सधन घरातील ती व्यक्ती कोरोनाला पराभूत करू शकली नसल्याने मृत झाली. तोपर्यंत त्या व्यक्तीचा मुलगा, सून, पत्नी या सगळ्यांना विलगिकरण केले होते. त्यामुळे त्यांना या व्यक्तीच्या अंत्यविधित सामील होता आले नाही.त्यांच्या मुलाला स्वत:च्या हाताने अग्नी देता आला नाही. त्याच्यासाठी शेवटचे रडणाराही कोणी नाही. हे पाहून जितेंद्र एवढ्या वर्षानंतर पाहिल्यांदाच गहिवरले. एवढ्या मोठ्या माणसाला शेवटचा निरोप द्यायलाही कोणी नाही. रुग्णालयातून त्यांचा देह घेण्यापासून तो दाहिनीमध्ये घालण्यापर्यंत सगळीच जबाबदारी जितेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आली. जितेंद्र यांना वाटले हे दृश्य एवढ्यावरच संपेल. पण तसे अजिबात झाले नाही. १८ एप्रिलपासून त्यांनी २०० च्या जवळ कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावली. विद्युतदाहिनीत त्यांचा अंत्यसंस्कार केला. हे सगळे केल्यावर मात्र पुन्हा एकदा रडू येऊ लागले आहे.शासन कर्तव्यापुढेमाणुसकी विसरावी लागतेकोरोनाबाधित मृतदेह नष्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्वत:च्या शरीराभोवती पीपीई किट परिधान करून मृतदेह हाताळावा लागतो. रुग्णालयातून आलेला मृतदेह पूर्णपणे झाकलेला असतो.अशावेळी परवानगी घेऊन स्मशानभूमीत आलेले मृतांची पत्नी, मुलगा, मुलगी जेव्हा हंबरडा फोडून, ‘साहेब, एकदाच तोंड दाखवा, शेवटचे दर्शन घेऊ द्या, जवळ जाणार नाही, लांबूनच बघू,’अशी विनवणी करतात, तेव्हा मात्र आमचाही जीव कासावीस होतो. त्यांची विनवणी ऐकून वाटते थोडे तोंड उघडे करून दाखवावे, पण कर्तव्य आणि आम्हाला शासनाने दिलेली सक्त ताकीद लक्षात येते आणि डोक्यात अश्रू दाटलेले असतानाही तो देह तसाच विद्युतदाहिनीत ढकलून त्याचे दार बंद करावे लागते. त्यानंतर एखाद्या अपराध्यासारखी नजर चुकवून नातेवाईकांना बाहेर जायला सांगावे लागते. जितेंद्र यांचा हा अनुभव माणसाला त्याची खरी ओळख करून देणारा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे