शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

coronavirus: ...आटलेले अश्रू कोरोनामुळे पुन्हा दाटले, विद्युतदाहिनीवरील कोरोना योद्धयाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 02:16 IST

कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, ‘साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना,’ तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या एका बहाद्दर कामगाराचे. ख-या कोरोना योद्ध्याचे

- अजित मांडकेठाणे : गेल्या २२ वर्षांत साडेतीन लाखांहून अधिक जणांवर अंत्यविधी केले. नातेवाईकांना रडताना पाहून सुरुवातीला मलाही रडू यायचे. परंतु, तीन-साडेतीन लाख जणांचे अंत्यविधी केल्यानंतर डोळ्यातले अश्रू नाहीसे झाले असे वाटत होते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही डोळ्यात अश्रू येत नव्हते. परंतु, कोरोनाने मात्र कोरड्या पडलेल्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आणले आहेत. कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, ‘साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना,’ तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या एका बहाद्दर कामगाराचे. ख-या कोरोना योद्ध्याचे.जव्हारबाग स्मशानभूमीत काम करणारे जितेंद्र मकवना हे १९९२-९३ मध्ये ठेकेदारी पद्धतीवर मृतदेह जाळण्याचा कामाला लागले. या २२-२३ वर्षांतील त्यांचे प्रमोशन म्हणजे सरणावर जाळणारी मृतदेह आता विद्युत दाहिनीत जाळली जात आहेत. हे काम करताना त्यांचे मन कठोर झाले आहे. मृतांच्या नातेवाइकांचे रडणे ऐकून, त्यांचे दु:ख पाहून जितेंद्र यांचेही दु:ख आणि अश्रू जणू संपले आहेत. हृदय कठोर झाले आहे. हे काम करीत असताना एखादा व्यक्ती मरणे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे ही सामान्य बाब झाली आहे. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हाही त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले नाहीत. परंतु, कोरोनाच्या संकटाने त्यांना बदलून टाकले आहे.200कोरोनाग्रस्तांवर केले अंत्यसंस्कारठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावल्याने त्याचा अंत्यविधी याच स्मशानभूमीत करण्यात आला. १८ एप्रिलला एका सधन घरातील ती व्यक्ती कोरोनाला पराभूत करू शकली नसल्याने मृत झाली. तोपर्यंत त्या व्यक्तीचा मुलगा, सून, पत्नी या सगळ्यांना विलगिकरण केले होते. त्यामुळे त्यांना या व्यक्तीच्या अंत्यविधित सामील होता आले नाही.त्यांच्या मुलाला स्वत:च्या हाताने अग्नी देता आला नाही. त्याच्यासाठी शेवटचे रडणाराही कोणी नाही. हे पाहून जितेंद्र एवढ्या वर्षानंतर पाहिल्यांदाच गहिवरले. एवढ्या मोठ्या माणसाला शेवटचा निरोप द्यायलाही कोणी नाही. रुग्णालयातून त्यांचा देह घेण्यापासून तो दाहिनीमध्ये घालण्यापर्यंत सगळीच जबाबदारी जितेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आली. जितेंद्र यांना वाटले हे दृश्य एवढ्यावरच संपेल. पण तसे अजिबात झाले नाही. १८ एप्रिलपासून त्यांनी २०० च्या जवळ कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावली. विद्युतदाहिनीत त्यांचा अंत्यसंस्कार केला. हे सगळे केल्यावर मात्र पुन्हा एकदा रडू येऊ लागले आहे.शासन कर्तव्यापुढेमाणुसकी विसरावी लागतेकोरोनाबाधित मृतदेह नष्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्वत:च्या शरीराभोवती पीपीई किट परिधान करून मृतदेह हाताळावा लागतो. रुग्णालयातून आलेला मृतदेह पूर्णपणे झाकलेला असतो.अशावेळी परवानगी घेऊन स्मशानभूमीत आलेले मृतांची पत्नी, मुलगा, मुलगी जेव्हा हंबरडा फोडून, ‘साहेब, एकदाच तोंड दाखवा, शेवटचे दर्शन घेऊ द्या, जवळ जाणार नाही, लांबूनच बघू,’अशी विनवणी करतात, तेव्हा मात्र आमचाही जीव कासावीस होतो. त्यांची विनवणी ऐकून वाटते थोडे तोंड उघडे करून दाखवावे, पण कर्तव्य आणि आम्हाला शासनाने दिलेली सक्त ताकीद लक्षात येते आणि डोक्यात अश्रू दाटलेले असतानाही तो देह तसाच विद्युतदाहिनीत ढकलून त्याचे दार बंद करावे लागते. त्यानंतर एखाद्या अपराध्यासारखी नजर चुकवून नातेवाईकांना बाहेर जायला सांगावे लागते. जितेंद्र यांचा हा अनुभव माणसाला त्याची खरी ओळख करून देणारा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे