शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

coronavirus : कार्यालयात पोहोचण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे द्राविडी प्राणायाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:28 PM

विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे.

- योगेश बिडवई

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉक डाऊननंतर मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातून बेस्ट तसेच इतर एसटी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र ही सेवा त्यांच्यासाठी पुरेशी नसल्याचे चित्र आहे. कार्यालयात पोहोचण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सर्कस करावी लागत आहे. 

विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कल्याण बस स्थानकाबाहेर मुंबईत जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसेसची व्यवस्था आहे. मात्र शुक्रवारी 12 वाजता मुंबईकडे जाणाऱ्या कल्याणच्या मुख्य बस स्टॉपवर गोंधळ सुरू होता. नायर रुग्णालयाच्या काही महिला कर्मचाऱ्यांना घेऊन न जाता बस रवाना झाली होती. कल्याणच्या वेगवेगळ्या भागातून पायपीट करत कर्मचारी बस स्टॉपवर येतात. मात्र काहींनी बस भरलेली नसताना आधीच नेल्याचे या महिलांनी सांगितले. बस स्टॉपवरून के.ई.एम रुग्णालय, जे जे रुग्णालय, टाटा रुग्णालय आदी ठिकाणी परिचारिकांसह इतर कर्मचारी रोज जातात. मात्र त्यांची संख्या आणि उपलब्ध बसेस यांचे गणित व्यस्त आहे. बस चुकल्यास दुसऱ्या बसमध्येही त्यांना घेतले जात नाही. 

साडेबाराच्या दरम्यान मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी,  पोलीस कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम संपवून घरी परतत होते. कल्याणला या बसमधील काही कर्मचारी उतरले. उर्वरीत कर्मचारी बदलापूरपर्यंतच्या मार्गावरील होते. या बसमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबलेले होते. 50 पेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये होते. त्यात काही उभे होते. एकीकडे गर्दी करू नका, असे सर्वसामान्यांना सांगितले जाते. मात्र कोरोनाच्या नियमांची सरकारी कर्मचाऱ्यांकडून पायमल्ली सुरू असल्याचे चित्र होते. या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली येथून कर्मचारी दररोज असेच अडचणींचा सामना करत मुंबईत कार्यालयात पोहोचतात आणि गर्दीत घरी येतात. 

वांद्रे, प्रतिक्षा नगर, सांताक्रुझ, वडाळा येथील आगाराच्या बस कल्याण, डोंबिवली परिसरात येतात. अनेकांना मुंबईत कार्यालयात पोहोचण्यासाठी दोन तीन वेळा बस बदलावी लागते. मात्र आम्ही अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर जाणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

दुपारी एक वाजता नायर रुग्णालयात पोहोचण्यासाठी 20-25 कर्मचारी एक वाजेच्या बसची वाट पाहत होते. मात्र दीड वाजेपर्यंत वडाळा आगाराची बस अालेली नव्हती. काहींना सलग 24 तासांची म्हणजे दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी तीनपर्यंत तर काहींना 12 तासांची ड्युटी असल्याचे नायर रुग्णालयाच्या कर्मचारी ज्योती कदम यांनी सांगितले. मात्र सुविधांचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आमची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाकार्यालयाकडून आम्हाला हॅण्ड सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले नसल्याचे अनेकांनी सांगितले. आमची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, असेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

आम्हाला बसच्या ड्रायव्हर किंवा कंडक्टरचा मोबाईल नंबर दिलेला नाही. बसची वाट पाहण्यापलिकडे आम्हाला मार्ग नाही. कल्याणहून मुंबईत जाताना रोज अडचणी येतात. 

- गौस शेख, सुरक्षा कर्मचारी, नायर रूग्णालय, मुंबई

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस