शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

coronavirus: रेमडेसिव्हिर औषधांच्या निविदा प्रक्रियेला महिनाभराचा विलंब, काळाबाजार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 2:29 AM

कोरोनाग्रस्त अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरण्यात येत असलेले ‘रेमडेसिव्हिर’ हे इंजेक्शन सध्या मोलाची मदत करीत आहे.

ठाणे : दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी उपापयोजना करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. कोरोनाग्रस्त अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरण्यात येत असलेले ‘रेमडेसिव्हिर’ हे इंजेक्शन सध्या मोलाची मदत करीत आहे. आता दोन महिने उलटल्यानंतर या इंजेक्शनच्या निविदा प्रक्रियेला पालिकेने सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात हे औषध मिळेपर्यंत जास्त कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. गेल्या दीड महिन्यात महापालिकेने ही प्रक्रि या का राबविली नाही, असा सवाल मनसेने केला आहे.ठाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुश्की ओढवली. मे महिन्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने भेटी देऊन मृत्युदर कमी करण्यासंदर्भात महापौर आणि आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर मुंबई महापालिकेने तत्काळ निविदा काढल्यामुळे सध्या मुंबईत रेमडेसिव्हिर इंजेक्शन काही प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचवेळी ठाणे महापालिकेनेही निविदा काढली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते, असा आरोप मनसेने केला आहे. पण, महापालिकेच्या कारभारामुळे ठाणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ४४५ रुग्णांना जीव गमवावा लागला असून, कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक गंभीर रुग्ण आहेत, ज्यांना या औषधाची गरज आहे. पण, त्यांना हे औषध मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनाही रुग्णाचा जीव वाचविण्यात अपयश येत आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी फक्त कागदी घोडे नाचविण्यापेक्षा आयुक्तांनी हे औषध वेळीच उपलब्ध करावे, अशी मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.सिप्ला, हिटेरो या दोन कंपन्यांकडून रेमडेसिव्हिर या औषधाचे उत्पादन केले जाते. ते काही ठिकाणी विक्रेत्यांना न देता थेट रुग्णालयांना पुरविण्यात येत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे औषधाच्या मागणीतही वाढ झाली आहे. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत सध्या पाच हजार ४०० इतकी आहे. वाढत्या मागणीमुळे या औषधांचाही काळाबाजार सुरू झाला आहे.याचबरोबर टोसीलिझुमॅब नावाचे दुसरे महागडे इंजेक्शन काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांना दिले जात आहे. त्याची किंमत21,000ते ३२ हजारांच्या घरात आहे. पण, या औषधांचा काळाबाजार होत असल्याने ते वाढीव दराने विक्र ी होत आहे. ठाण्यातील रुग्णांना हे औषध लवकर उपलब्ध होत असताना काळाबाजार होणार नाही, याचीही दक्षता पालिकेने वेळीच घेणे आवश्यक असल्याचेही महिंद्रकर यांनी सांगितले.रेमडेसिव्हिर औषध हे ठाणे महानगरपालिकेच्या रु ग्णांना लागले, तर त्यासाठी त्यांना प्रतिव्हायल चार हजार १५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे औषध मुंबई महानगरपालिकेच्या रु ग्णालयांतील रुग्णांना मोफत मिळणार आहे. ठाणेकर नागरिकांना पुरेशा डोससाठी २० हजार ते २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सद्य:स्थितीत हे औषध ठाण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे