शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

Coronavirus : कल्याण ग्रामीणमध्ये लग्नसोहळ्यांना होतेय गर्दी, तहसीलदारांचा कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:36 AM

अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.

टिटवाळा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कल्याण तालुक्यात ग्रामीण भागात विवाहसोहळ्यांची धामधूम जोरात सुरू आहे. या सोहळ्यांना गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.गुरुवार, १९ मार्चला ग्रामीण भागात गावागावांत विवाहसोहळ्यांची धामधूम सुरू होती. या सोहळ्यांना शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमत असल्यामुळे चिंताजनक बाब आहे. याकडे पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या धोक्याविषयी जनजागृती आणि उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. कुठे कुठे एखादा फलक दिसत आहे. तर प्राथमिक आरोग्यकेंद्राचे अधिकारीही गायब असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले. सोहळे-समारंभांना वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती चिघळू शकते, अशी भीती नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली.विवाह सोहळ्यांत दिसणारी गर्दी अशीच राहिली तर कोरोना आजार पसरण्यास मदत होईल, हे धोकादायक आहे. गर्दी टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे.- डॉ. राम मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी.कोरोना आजाराची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. गर्दी टाळावी आणि केंद्र आणि राज्य सरकारलासहकार्य करावे.- आमदार किसन कथोरे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्नthaneठाणे