शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Coronavirus: कोरोनामुळे जोडप्याचे घरातच उरकले शुभमंगल सावधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:15 IST

मास्क घालून केला विवाह : ज्येष्ठांचे आशीर्वादही ऑनलाइनच

प्रज्ञा म्हात्रे  

ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधूवरांना विवाह पुढे ढकलावे लागले; परंतु ठाण्यातील संघवी आणि बाफना कुटुंबाने त्यांच्या मुलांचे शुभमंगल ठरलेल्या तारखेला घरातच उरकले. त्यानुसार ठाण्याचा वर आणि मुंबईच्या वधूचा घरगुती विवाहसोहळा नुकताच झाला. या घरगुती सोहळ्यादरम्यान वरवधूंनीही मास्क घातले होते.

ठाण्याचा राज संघवी आणि वृषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांनी २ मे २0२0 ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. नातेवाइकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमंत्रणही देण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेल्याने नातेवाइकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता; पण दोन्ही कुटुंबांनी घरातच विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला, असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना आॅनलाइन अर्ज केला असता, तीन लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

लग्नाचे कपडे नसल्याने घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. बाफना कुटुंबातील वृषाली, तिचे आई-वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद या नववधूवरांनी व्हिडीओ कॉलद्वारे घेतले.लग्न साध्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव व्याहींसमोर मी आधीच ठेवला होता; पण त्यांना धामधुमीत करायचे होते. शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असल्याचे महेंद्र यांनी संघवी सांगितले. सोसायटीतील रहिवाशांनी थाळी वाजवून नवदाम्पत्याचे स्वागत केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न