शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

Coronavirus: कोरोनामुळे जोडप्याचे घरातच उरकले शुभमंगल सावधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:15 IST

मास्क घालून केला विवाह : ज्येष्ठांचे आशीर्वादही ऑनलाइनच

प्रज्ञा म्हात्रे  

ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधूवरांना विवाह पुढे ढकलावे लागले; परंतु ठाण्यातील संघवी आणि बाफना कुटुंबाने त्यांच्या मुलांचे शुभमंगल ठरलेल्या तारखेला घरातच उरकले. त्यानुसार ठाण्याचा वर आणि मुंबईच्या वधूचा घरगुती विवाहसोहळा नुकताच झाला. या घरगुती सोहळ्यादरम्यान वरवधूंनीही मास्क घातले होते.

ठाण्याचा राज संघवी आणि वृषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांनी २ मे २0२0 ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. नातेवाइकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमंत्रणही देण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेल्याने नातेवाइकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता; पण दोन्ही कुटुंबांनी घरातच विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला, असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना आॅनलाइन अर्ज केला असता, तीन लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

लग्नाचे कपडे नसल्याने घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. बाफना कुटुंबातील वृषाली, तिचे आई-वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद या नववधूवरांनी व्हिडीओ कॉलद्वारे घेतले.लग्न साध्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव व्याहींसमोर मी आधीच ठेवला होता; पण त्यांना धामधुमीत करायचे होते. शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असल्याचे महेंद्र यांनी संघवी सांगितले. सोसायटीतील रहिवाशांनी थाळी वाजवून नवदाम्पत्याचे स्वागत केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न