शहरं
Join us  
Trending Stories
1
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
2
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
3
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
4
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
5
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
6
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
7
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
8
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
9
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
10
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
13
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
14
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
15
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
16
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
17
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
18
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
19
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
20
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्युदराचा आलेख लॉकडाऊनमध्येही चढताच, रुग्णसंख्येतही फारशी घट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:35 IST

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व पर्यायाने मृत्यू वाढत असल्याने कडक लॉकडाऊन पुन्हा लागू केला गेला. आता त्याला आठवडाभराची मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जराही कमी झालेला नाही. रुग्णसंख्येतील घट फारच मामुली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नव्हे तर सक्षम वैद्यकीय व्यवस्था उभी करणे, हाच मृत्युदर कमी करण्याचा मार्ग असू शकतो. कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन टोकलिझुमॅब व रेमडेसिविर हीच उपलब्ध नसतील, तर रुग्णांचे मृत्यू कसे रोखले जाणार, असा सवाल लॉकडाऊनच्या फार्समुळे संतापलेले ठाणेकर करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.त्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णसंख्या व मृत्यूंशी दि. ३ ते ९ जुलैदरम्यान लॉकडाऊनच्या काळातील रुग्णसंख्या व मृत्यूंशी तुलना केली असता लॉकडाऊन सपशेल निरर्थक ठरला आहे.१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णसंख्या व मृत्यू असेठाणे : (३६६/१४), कल्याण-डोंबिवली : (३५०/३), अंबरनाथ : (४५/६), बदलापूर : (३३/०), भिवंडी : (८२/३), उल्हासनगर : (६८/०), मीरा रोड-भाईंदर : (११२/०), नवी मुंबई : (२१८/६), ठाणे ग्रामीण : (५१/१)३ जुलैपासून ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांत लॉकडाऊन लागू झाला. त्या दिवसापासून दररोजची रुग्णसंख्या व मृत्यू याची तुलना अशी :दि. ३ जुलै : ठाणे : (४२०/१७), कल्याण-डोंबिवली : (५६४/३), अंबरनाथ : (१०१/५), बदलापूर : (४८/०), भिवंडी : (६३/४), उल्हासनगर : (१९१/२), मीरा रोड-भाईंदर : (२७६/३), नवी मुंबई : (२५७/८), ठाणे ग्रामीण : (१०८/४)दि. ४ जुलै : ठाणे : (४०८/१७), कल्याण-डोंबिवली : (५५५/५), अंबरनाथ : (९४/१), बदलापूर : (४६/१), भिवंडी : (७७/१), उल्हासनगर : (२१२/३), मीरा रोड-भाईंदर : (१२६/६), नवी मुंबई : (१५७/७), ठाणे ग्रामीण : (१७३/४)दि. ५ जुलै : ठाणे : (३७३/१६), कल्याण-डोंबिवली : (४८२/५), अंबरनाथ : (७४/१२), बदलापूर : (२१/०), भिवंडी : (६९/१), उल्हासनगर : (२५१/१), मीरा रोड-भाईंदर : (३०३/४), नवी मुंबई : (१९१/५), ठाणे ग्रामीण : (११२/३)दि. ६ जुलै : ठाणे : (२६८/१४), कल्याण-डोंबिवली : (४१३/४), अंबरनाथ : (५६/५), बदलापूर : (३८/१), भिवंडी : (८८/०), उल्हासनगर : (१५९/३), मीरा रोड-भाईंदर : (१५७/४), नवी मुंबई : (१६४/८), ठाणे ग्रामीण : (१६७/०)दि. ७ जुलै : ठाणे : (२९६/१६), कल्याण-डोंबिवली : (३८१/७), अंबरनाथ : (५१/३), बदलापूर : (६२/१), भिवंडी : (३०/०), उल्हासनगर : (११९/१), मीरा रोड-भाईंदर : (१६१/४), नवी मुंबई : (११५/८), ठाणे ग्रामीण : (१२४/५)दि. ८ जुलै : ठाणे : (४१०/१७), कल्याण-डोंबिवली : (४७१/७), अंबरनाथ : (७५/४), बदलापूर : (८५/१), भिवंडी : (९५/६), उल्हासनगर : (१७२/०), मीरा रोड-भाईंदर : (१७५/४), नवी मुंबई : (२०७/९), ठाणे ग्रामीण : (१०७/३)09 जुलैठाणे : (३४८/१६), कल्याण-डोंबिवली : (५८०/६), अंबरनाथ : (५०/२), बदलापूर : (३६/१), भिवंडी : (५१/८), उल्हासनगर : (१६४/३), मीरा रोड-भाईंदर : (१८५/२), नवी मुंबई : (२३९/९), ठाणे ग्रामीण : (१४०/३)आकडेवारी पाहिली तर ठाणे शहरात दररोज साधारण १४ ते १७ रुग्णांचा मृत्यू होत आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज साधारण होणारे मृत्यू लॉकडाऊन काळात वाढले आहेत. साधारण सात व्यक्ती रोज मरण पावत आहेत.अंबरनाथ-बदलापूरमधील मृत्युसंख्येत फार फरक पडलेला नाही. भिवंडीतील मृत्यू वाढले आहेत. उल्हासनगर, मीरा-भार्इंदरच्या मृत्यूमध्ये फार फरक पडलेला नाही. दररोज ३ ते ७ व्यक्ती या दोन्ही शहरांत मरण पावत आहेत.नवी मुंबईतही दररोज सात ते नऊ व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. तीच गत ठाणे ग्रामीणची असून तेथेही दररोज तीन ते पाच व्यक्ती दगावत आहेत. केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मृत्यू रोखण्यास सांगितले होते. लॉकडाऊनमुळे त्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे