शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

coronavirus: ठाण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्युदराचा आलेख लॉकडाऊनमध्येही चढताच, रुग्णसंख्येतही फारशी घट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:35 IST

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व पर्यायाने मृत्यू वाढत असल्याने कडक लॉकडाऊन पुन्हा लागू केला गेला. आता त्याला आठवडाभराची मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जराही कमी झालेला नाही. रुग्णसंख्येतील घट फारच मामुली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नव्हे तर सक्षम वैद्यकीय व्यवस्था उभी करणे, हाच मृत्युदर कमी करण्याचा मार्ग असू शकतो. कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन टोकलिझुमॅब व रेमडेसिविर हीच उपलब्ध नसतील, तर रुग्णांचे मृत्यू कसे रोखले जाणार, असा सवाल लॉकडाऊनच्या फार्समुळे संतापलेले ठाणेकर करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.त्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णसंख्या व मृत्यूंशी दि. ३ ते ९ जुलैदरम्यान लॉकडाऊनच्या काळातील रुग्णसंख्या व मृत्यूंशी तुलना केली असता लॉकडाऊन सपशेल निरर्थक ठरला आहे.१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णसंख्या व मृत्यू असेठाणे : (३६६/१४), कल्याण-डोंबिवली : (३५०/३), अंबरनाथ : (४५/६), बदलापूर : (३३/०), भिवंडी : (८२/३), उल्हासनगर : (६८/०), मीरा रोड-भाईंदर : (११२/०), नवी मुंबई : (२१८/६), ठाणे ग्रामीण : (५१/१)३ जुलैपासून ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांत लॉकडाऊन लागू झाला. त्या दिवसापासून दररोजची रुग्णसंख्या व मृत्यू याची तुलना अशी :दि. ३ जुलै : ठाणे : (४२०/१७), कल्याण-डोंबिवली : (५६४/३), अंबरनाथ : (१०१/५), बदलापूर : (४८/०), भिवंडी : (६३/४), उल्हासनगर : (१९१/२), मीरा रोड-भाईंदर : (२७६/३), नवी मुंबई : (२५७/८), ठाणे ग्रामीण : (१०८/४)दि. ४ जुलै : ठाणे : (४०८/१७), कल्याण-डोंबिवली : (५५५/५), अंबरनाथ : (९४/१), बदलापूर : (४६/१), भिवंडी : (७७/१), उल्हासनगर : (२१२/३), मीरा रोड-भाईंदर : (१२६/६), नवी मुंबई : (१५७/७), ठाणे ग्रामीण : (१७३/४)दि. ५ जुलै : ठाणे : (३७३/१६), कल्याण-डोंबिवली : (४८२/५), अंबरनाथ : (७४/१२), बदलापूर : (२१/०), भिवंडी : (६९/१), उल्हासनगर : (२५१/१), मीरा रोड-भाईंदर : (३०३/४), नवी मुंबई : (१९१/५), ठाणे ग्रामीण : (११२/३)दि. ६ जुलै : ठाणे : (२६८/१४), कल्याण-डोंबिवली : (४१३/४), अंबरनाथ : (५६/५), बदलापूर : (३८/१), भिवंडी : (८८/०), उल्हासनगर : (१५९/३), मीरा रोड-भाईंदर : (१५७/४), नवी मुंबई : (१६४/८), ठाणे ग्रामीण : (१६७/०)दि. ७ जुलै : ठाणे : (२९६/१६), कल्याण-डोंबिवली : (३८१/७), अंबरनाथ : (५१/३), बदलापूर : (६२/१), भिवंडी : (३०/०), उल्हासनगर : (११९/१), मीरा रोड-भाईंदर : (१६१/४), नवी मुंबई : (११५/८), ठाणे ग्रामीण : (१२४/५)दि. ८ जुलै : ठाणे : (४१०/१७), कल्याण-डोंबिवली : (४७१/७), अंबरनाथ : (७५/४), बदलापूर : (८५/१), भिवंडी : (९५/६), उल्हासनगर : (१७२/०), मीरा रोड-भाईंदर : (१७५/४), नवी मुंबई : (२०७/९), ठाणे ग्रामीण : (१०७/३)09 जुलैठाणे : (३४८/१६), कल्याण-डोंबिवली : (५८०/६), अंबरनाथ : (५०/२), बदलापूर : (३६/१), भिवंडी : (५१/८), उल्हासनगर : (१६४/३), मीरा रोड-भाईंदर : (१८५/२), नवी मुंबई : (२३९/९), ठाणे ग्रामीण : (१४०/३)आकडेवारी पाहिली तर ठाणे शहरात दररोज साधारण १४ ते १७ रुग्णांचा मृत्यू होत आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज साधारण होणारे मृत्यू लॉकडाऊन काळात वाढले आहेत. साधारण सात व्यक्ती रोज मरण पावत आहेत.अंबरनाथ-बदलापूरमधील मृत्युसंख्येत फार फरक पडलेला नाही. भिवंडीतील मृत्यू वाढले आहेत. उल्हासनगर, मीरा-भार्इंदरच्या मृत्यूमध्ये फार फरक पडलेला नाही. दररोज ३ ते ७ व्यक्ती या दोन्ही शहरांत मरण पावत आहेत.नवी मुंबईतही दररोज सात ते नऊ व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. तीच गत ठाणे ग्रामीणची असून तेथेही दररोज तीन ते पाच व्यक्ती दगावत आहेत. केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मृत्यू रोखण्यास सांगितले होते. लॉकडाऊनमुळे त्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे