शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

coronavirus: ठाण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्युदराचा आलेख लॉकडाऊनमध्येही चढताच, रुग्णसंख्येतही फारशी घट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:35 IST

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व पर्यायाने मृत्यू वाढत असल्याने कडक लॉकडाऊन पुन्हा लागू केला गेला. आता त्याला आठवडाभराची मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जराही कमी झालेला नाही. रुग्णसंख्येतील घट फारच मामुली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नव्हे तर सक्षम वैद्यकीय व्यवस्था उभी करणे, हाच मृत्युदर कमी करण्याचा मार्ग असू शकतो. कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन टोकलिझुमॅब व रेमडेसिविर हीच उपलब्ध नसतील, तर रुग्णांचे मृत्यू कसे रोखले जाणार, असा सवाल लॉकडाऊनच्या फार्समुळे संतापलेले ठाणेकर करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.त्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णसंख्या व मृत्यूंशी दि. ३ ते ९ जुलैदरम्यान लॉकडाऊनच्या काळातील रुग्णसंख्या व मृत्यूंशी तुलना केली असता लॉकडाऊन सपशेल निरर्थक ठरला आहे.१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णसंख्या व मृत्यू असेठाणे : (३६६/१४), कल्याण-डोंबिवली : (३५०/३), अंबरनाथ : (४५/६), बदलापूर : (३३/०), भिवंडी : (८२/३), उल्हासनगर : (६८/०), मीरा रोड-भाईंदर : (११२/०), नवी मुंबई : (२१८/६), ठाणे ग्रामीण : (५१/१)३ जुलैपासून ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांत लॉकडाऊन लागू झाला. त्या दिवसापासून दररोजची रुग्णसंख्या व मृत्यू याची तुलना अशी :दि. ३ जुलै : ठाणे : (४२०/१७), कल्याण-डोंबिवली : (५६४/३), अंबरनाथ : (१०१/५), बदलापूर : (४८/०), भिवंडी : (६३/४), उल्हासनगर : (१९१/२), मीरा रोड-भाईंदर : (२७६/३), नवी मुंबई : (२५७/८), ठाणे ग्रामीण : (१०८/४)दि. ४ जुलै : ठाणे : (४०८/१७), कल्याण-डोंबिवली : (५५५/५), अंबरनाथ : (९४/१), बदलापूर : (४६/१), भिवंडी : (७७/१), उल्हासनगर : (२१२/३), मीरा रोड-भाईंदर : (१२६/६), नवी मुंबई : (१५७/७), ठाणे ग्रामीण : (१७३/४)दि. ५ जुलै : ठाणे : (३७३/१६), कल्याण-डोंबिवली : (४८२/५), अंबरनाथ : (७४/१२), बदलापूर : (२१/०), भिवंडी : (६९/१), उल्हासनगर : (२५१/१), मीरा रोड-भाईंदर : (३०३/४), नवी मुंबई : (१९१/५), ठाणे ग्रामीण : (११२/३)दि. ६ जुलै : ठाणे : (२६८/१४), कल्याण-डोंबिवली : (४१३/४), अंबरनाथ : (५६/५), बदलापूर : (३८/१), भिवंडी : (८८/०), उल्हासनगर : (१५९/३), मीरा रोड-भाईंदर : (१५७/४), नवी मुंबई : (१६४/८), ठाणे ग्रामीण : (१६७/०)दि. ७ जुलै : ठाणे : (२९६/१६), कल्याण-डोंबिवली : (३८१/७), अंबरनाथ : (५१/३), बदलापूर : (६२/१), भिवंडी : (३०/०), उल्हासनगर : (११९/१), मीरा रोड-भाईंदर : (१६१/४), नवी मुंबई : (११५/८), ठाणे ग्रामीण : (१२४/५)दि. ८ जुलै : ठाणे : (४१०/१७), कल्याण-डोंबिवली : (४७१/७), अंबरनाथ : (७५/४), बदलापूर : (८५/१), भिवंडी : (९५/६), उल्हासनगर : (१७२/०), मीरा रोड-भाईंदर : (१७५/४), नवी मुंबई : (२०७/९), ठाणे ग्रामीण : (१०७/३)09 जुलैठाणे : (३४८/१६), कल्याण-डोंबिवली : (५८०/६), अंबरनाथ : (५०/२), बदलापूर : (३६/१), भिवंडी : (५१/८), उल्हासनगर : (१६४/३), मीरा रोड-भाईंदर : (१८५/२), नवी मुंबई : (२३९/९), ठाणे ग्रामीण : (१४०/३)आकडेवारी पाहिली तर ठाणे शहरात दररोज साधारण १४ ते १७ रुग्णांचा मृत्यू होत आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज साधारण होणारे मृत्यू लॉकडाऊन काळात वाढले आहेत. साधारण सात व्यक्ती रोज मरण पावत आहेत.अंबरनाथ-बदलापूरमधील मृत्युसंख्येत फार फरक पडलेला नाही. भिवंडीतील मृत्यू वाढले आहेत. उल्हासनगर, मीरा-भार्इंदरच्या मृत्यूमध्ये फार फरक पडलेला नाही. दररोज ३ ते ७ व्यक्ती या दोन्ही शहरांत मरण पावत आहेत.नवी मुंबईतही दररोज सात ते नऊ व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. तीच गत ठाणे ग्रामीणची असून तेथेही दररोज तीन ते पाच व्यक्ती दगावत आहेत. केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मृत्यू रोखण्यास सांगितले होते. लॉकडाऊनमुळे त्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे