शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video: 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो'; अंबरनाथ पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 09:41 IST

अंबरनाथ शहरात चोख पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी असतानादेखील अनेक नागरिक काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत.

अंबरनाथ: कोरोनाचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल असं पंतप्रधानांनी सांगितले आहे.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेली असताना देखील अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. काम नसतानाही घराबाहेर पडणाऱ्या या नागरिकांना आवाहन करण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो' हे गाणं गाऊन पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

अंबरनाथ शहरात चोख पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी असतानादेखील अनेक नागरिक काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत. भाजी खरेदी, किराणा खरेदी, आणि औषध खरेदी च्या नावावर भटकंती करण्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा टवाळखोर लोकांना पोलीस सर्वत्र चोप देखील देत आहेत. मात्र अंबरनाथ पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांच्या नेतृत्वाखाली अनोखी शक्कल लढवली आहे.

पोलीस खात्यात असलेले आणि चांगले गायक असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन रस्त्यावर देशभक्तीपर गीत गाऊन नागरिकांना भावनिक आवाहन करण्याचे काम केले जात आहे. केवळ फटके मारून लोक सुधारणार नाही या जाणिवेतून आता पोलिसांनी देशभक्तीपर गीतांचा आधार घेतला आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे. तसेच त्यांच्या या गांधीगिरी मार्गाचा अवलंब इतर पोलिसांनाही करावा अशी मागणी आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. १४ एप्रिलपर्यंत कोरोना संक्रमणाची साखळी मोडून काढायची आहे. त्यासाठी लोकांना घराबाहेर पडू नका असं सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ७७० लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस