शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

Video: 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो'; अंबरनाथ पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 09:41 IST

अंबरनाथ शहरात चोख पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी असतानादेखील अनेक नागरिक काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत.

अंबरनाथ: कोरोनाचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल असं पंतप्रधानांनी सांगितले आहे.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेली असताना देखील अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. काम नसतानाही घराबाहेर पडणाऱ्या या नागरिकांना आवाहन करण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो' हे गाणं गाऊन पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

अंबरनाथ शहरात चोख पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी असतानादेखील अनेक नागरिक काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत. भाजी खरेदी, किराणा खरेदी, आणि औषध खरेदी च्या नावावर भटकंती करण्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा टवाळखोर लोकांना पोलीस सर्वत्र चोप देखील देत आहेत. मात्र अंबरनाथ पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांच्या नेतृत्वाखाली अनोखी शक्कल लढवली आहे.

पोलीस खात्यात असलेले आणि चांगले गायक असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन रस्त्यावर देशभक्तीपर गीत गाऊन नागरिकांना भावनिक आवाहन करण्याचे काम केले जात आहे. केवळ फटके मारून लोक सुधारणार नाही या जाणिवेतून आता पोलिसांनी देशभक्तीपर गीतांचा आधार घेतला आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे. तसेच त्यांच्या या गांधीगिरी मार्गाचा अवलंब इतर पोलिसांनाही करावा अशी मागणी आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. १४ एप्रिलपर्यंत कोरोना संक्रमणाची साखळी मोडून काढायची आहे. त्यासाठी लोकांना घराबाहेर पडू नका असं सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ७७० लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस