शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : ठाणे जिल्ह्यात मृत्यूच्या संख्येत घट, आरोग्य यंत्रणेला दिलासा; गुरुवारी २३ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 09:25 IST

ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत गुरुवारी समाधानकारक घट झाली. जिल्हाभरात ८५९ रुग्णांची नव्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन लाख चार हजार ५१३, तर २३ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या पाच हजार १८१ झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीला २७ बाधित आढळले असून एक मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ११० रुग्णांच्या वाढीसह पाच मृत्यू झाले आहेत. अंबरनाथला २६ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये ३३ रुग्ण सापडले असून दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.

नवी मुंबईत ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबई : शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी २०२ रुग्ण वाढले असून २५४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के झाले आहे. सद्यस्थितीमध्ये २६१५ रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ८६८ झाला आहे.

रायगडमध्ये २०८ रुग्णांची नोंद
रायगड जिल्ह्यात गुरुवारी २०८ दिवसभरात कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ०९ जणांचा मृत्यू झाला तर २७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सद्यस्थितीत १८६५ रुग्णांवर उपचार सुरुआहेत.

वसई विरारमध्ये ४ रुग्णांचा मृत्यू
वसई-विरार महापालिका हद्दीत गुरुवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला तर १०४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात शहरात १५५ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्तही झाले आहेत. त्यामुळे शहरांत आता फक्त १०८८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू