शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : लसीच्या तुटवड्याने मीरा भाईंदरमध्ये दिला जात आहे फक्त दुसरा डोस; नागरिकांमध्ये संताप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 18:05 IST

Corona Vaccine In Mira Bhayander : शासनाकडून मीरा भाईंदर महापालिकेला १ लाख ६ हजार ६२० लसीं देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरु केली होती.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेकडे गुरुवारी रात्रीपर्यंत कोविशील्डच्या केवळ ३३४० इतक्याच लस शिल्लक असल्याने शुक्रवारी पालिकेने दुसरा डोस असणाऱ्या केवळ ५०० जणांनाच लस दिली. लस नसल्याने पालिकेने ६ लसीकरण केंद्र तात्पुरती बंद केली असून केवळ ५ केंद्रच सुरू ठेवली आहेत. लस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले.

शासनाकडून मीरा भाईंदर महापालिकेला १ लाख ६ हजार ६२० लसीं देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरु केली होती. तर खाजगी ९ लसीकरण केंद्र आहेत. पालिकेने जास्तीजास्त नागरिकांना कोरोनाची लस लवकर मिळावी म्हणून रोजच्या ३ ते साडे तीन हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून देखील रोज सुमारे ५ हजार लोकांना लस दिली जात होती.

गुरुवार रात्रीपर्यंत महापालिकेकडे केवळ ३३४० लसच शिल्लक राहिल्या. शासनाकडून लस येणे तूर्तास अवघड असल्याने पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चर्चा करून शुक्रवार पासून मीरारोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन केंद्रातील लसीकरण तापुरते बंद केले.

शुक्रवारपासून भीमसेन जोशी रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्र ह्या ५ ठिकाणीच लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. नव्याने लस देणे बंद केले असून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अश्या लोकांनाच दुसरा डोस दिला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर फक्त १०० लोकांनाच लस दिली जात आहे. म्हणजेच लस चा साठा येत नाही तो पर्यंत रोज एकूण ५०० लोकांनाच लस दिली जाणार आहे.

जेणे करून आज लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्र बंद झाल्याचे तर ज्या ५ ठिकाणी केंद्र सुरु होते तेथे केवळ दुसऱ्या डोस ची लस दिली जाणार असल्याचे समजल्यावर संताप व्यक्त होत होता. काठी ठिकाणी हुज्जत घातली जात होती. लस नसल्याने अनेक लोक रिकाम्या हाताने परत गेले. केवळ १०० लोकांनाच लस द्यायची असल्याने दुपारनंतर लसीकरण केंद्रावर शुकशुकाट होता.

पंतप्रधान म्हणाले की,  लसीकरण उत्सव साजरा करायचा. पण आम्हाला लस मिळणारच नसेल तर हा कसला उत्सव असा संताप काहींनी व्यक्त केला. तर केंद्र व राज्य शासनाच्या राजकीय वादातून सामान्य नागरिक मात्र लसीकरण अभावी जीव गमावण्यास कारणीभूत ठरल्याचा रोष काहींनी व्यक्त केला.

डॉ . अंजली पाटील (लसीकरण अधिकारी , महापालिका) - शासनाकडून लसीचा पुरवठा सुरू होताच पुन्हा सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाईल. सध्या ५ केंद्रात लसीकरण सुरू आहे. तेथे रोज दुसरा डोस बाकी असणाऱ्या प्रत्येकी १०० जणांना लस दिली जात आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. ऑनलाईन नोंदणी करावी. केंद्रात सर्व सुविधा व आवश्यक कर्मचारी तैनात आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर