शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठाणे जिल्ह्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 5:12 AM

दिवसभरात सापडले ७१० रुग्ण

ठाणे  : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७१० रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख २२ हजार ९१२ बाधित रुग्ण झाले असून दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ५९२ झाली आहे. यामुळे कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात १९६ रुग्ण आढळले असून शहरात आता ४९ हजार ७६९ रुग्ण नोंदले गेले आहेत, तर तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार २१२ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत १४९ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात ५२ हजार ५३३ बाधित झाले असून एक हजार ४० मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये २१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही.भिवंडीला १६ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ४४ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरला ४२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित सात हजार ७९९ झाले आहेत. या शहरात मृत्यू न झाल्यामुळे ९८ मृत्यू कायम आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५४ रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. येथील १७ हजार ७३७ बाधितांसह ५५९ मृतांची नोंदणी झाली आहे.

रायगड जिल्ह्यात ८५ रुग्णांची नोंदरायगड : जिल्ह्यात शनिवारी ८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ५६ हजार ०७१ वर पोचली आहे. आतार्पयत एकूण १५९३ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, आतार्पयत ५३ हजार५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.नवी मुंबईत१६९ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात शनिवारी दिवसभरात १६९ रुग्ण वाढले असून ९१ बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४६,९५६ झाली असून त्यापैकी ४४,६५९ जण बरे झाले आहेत. शिल्लक रुग्णांची संख्या १,३४० वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. वसई-विरारमध्ये५२ नवे रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात ५२ रुग्ण नव्याने आढळून आले असून ४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर अजूनही ४३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या