शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

परिस्थितीला स्वीकारून जुळवून घ्यायला कोरोनाने शिकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

धकाधकीच्या आयुष्यामुळे लांब गेलेली नाती जवळ आली, आपापसातले नातेसंबंध सुधारू लागले. विशेषत: पती पत्नीच्या नात्यात समजून घेण्यात सकारात्मक बदल ...

धकाधकीच्या आयुष्यामुळे लांब गेलेली नाती जवळ आली, आपापसातले नातेसंबंध सुधारू लागले. विशेषत: पती पत्नीच्या नात्यात समजून घेण्यात सकारात्मक बदल झाले. बदललेल्या जीवनशैलीत अनेकांनी सुधारणा केल्या आणि आपल्या आहाराकडे लक्ष दिले. अनेक जण व्यायामाकडे वळले. काहीजण चक्क पाककलेत निपुण झाले, नवनवीन पदार्थ बनवायला शिकले. एकत्र कुटुंबात राहून एकमेकांची नव्याने काळजी घ्यायला लागले. पुरुषांनी आपली ऑनलाइन कामे करून घरकामातही मदत केली. वर्क फ्रॉम होममुळे बाहेर पडणे बंद झाल्याने प्रवास खर्च आणि इतर अतिरिक्त खर्च वाचू लागला. घरच्या घरी ऑनलाइन व्यायाम करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देता आले. त्यामुळे बराच फरक पडला. पालकांना आपल्या मुलांना वेळ देता आला. या काळात कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवता आला. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेता आली. आपल्यासोबत आपले कोणीतरी आहे याची जाणीव घरातील प्रत्येक सदस्याला झाली. विशेष म्हणजे कोरोनाकाळात आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष काळजी घेऊ लागले.

दुसरीकडे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, व्यवसाय बंद झाले आणि हे सर्वजण बेरोजगार झाले. बेरोजगार झाल्यामुळे त्यांना नैराश्य येऊ लागले. शैक्षणिक नुकसान तर न भरून येण्याजोगे झाले. कोरोनाची लागण झालेले अनेक जण बरे झाले, काही दगावले, ज्यांच्या घरात कोरोनाग्रस्त मृत पावले त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या काळात अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली.

असे असतानाही कोरोना काळात लोक आहे त्यात आनंद मानायला शिकले. अनेक लोक कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त सुख शोधायला शिकले. एकमेकांशी स्पर्धा विसरून एकमेकांच्या मदतीला धावून गेले. सामाजिक संस्था लोकांच्या मदतीला धावल्या. याशिवाय या काळात डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेविका यांच कार्य तर बहुमूल्य ठरले. या अशा अनेक परिस्थितीचा सामना करत आलेल्या परिस्थितीला स्वीकारत कोरोनाशी आनंदाने जुळवून घ्यायला शिकले. हे सर्व सामान्य लोकांचे आयुष्य झाले. पण दिव्यांगांच्या बाबतीत परिस्थिती अतिशय कठीण होती. त्यांना आणि त्यांच्या पालकांचे कोरोना आणि टाळेबंदीचे गणित समजेनासे झाले आहे. दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नसल्याने त्यांची व त्यांच्या पालकांची मानसिकता समजून घ्यायला हवी.

आता सामाजिक अंतर ठेवून वागणे, सतत मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता हे सर्व बदल स्वीकारणे जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत.

- मीना क्षीरसागर,

मुख्याध्यापक,

विश्वास गतिमंद मुलांसाठीचे केंद्र,

ठाणे