शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

परिस्थितीला स्वीकारून जुळवून घ्यायला कोरोनाने शिकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

धकाधकीच्या आयुष्यामुळे लांब गेलेली नाती जवळ आली, आपापसातले नातेसंबंध सुधारू लागले. विशेषत: पती पत्नीच्या नात्यात समजून घेण्यात सकारात्मक बदल ...

धकाधकीच्या आयुष्यामुळे लांब गेलेली नाती जवळ आली, आपापसातले नातेसंबंध सुधारू लागले. विशेषत: पती पत्नीच्या नात्यात समजून घेण्यात सकारात्मक बदल झाले. बदललेल्या जीवनशैलीत अनेकांनी सुधारणा केल्या आणि आपल्या आहाराकडे लक्ष दिले. अनेक जण व्यायामाकडे वळले. काहीजण चक्क पाककलेत निपुण झाले, नवनवीन पदार्थ बनवायला शिकले. एकत्र कुटुंबात राहून एकमेकांची नव्याने काळजी घ्यायला लागले. पुरुषांनी आपली ऑनलाइन कामे करून घरकामातही मदत केली. वर्क फ्रॉम होममुळे बाहेर पडणे बंद झाल्याने प्रवास खर्च आणि इतर अतिरिक्त खर्च वाचू लागला. घरच्या घरी ऑनलाइन व्यायाम करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देता आले. त्यामुळे बराच फरक पडला. पालकांना आपल्या मुलांना वेळ देता आला. या काळात कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवता आला. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेता आली. आपल्यासोबत आपले कोणीतरी आहे याची जाणीव घरातील प्रत्येक सदस्याला झाली. विशेष म्हणजे कोरोनाकाळात आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष काळजी घेऊ लागले.

दुसरीकडे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, व्यवसाय बंद झाले आणि हे सर्वजण बेरोजगार झाले. बेरोजगार झाल्यामुळे त्यांना नैराश्य येऊ लागले. शैक्षणिक नुकसान तर न भरून येण्याजोगे झाले. कोरोनाची लागण झालेले अनेक जण बरे झाले, काही दगावले, ज्यांच्या घरात कोरोनाग्रस्त मृत पावले त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या काळात अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली.

असे असतानाही कोरोना काळात लोक आहे त्यात आनंद मानायला शिकले. अनेक लोक कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त सुख शोधायला शिकले. एकमेकांशी स्पर्धा विसरून एकमेकांच्या मदतीला धावून गेले. सामाजिक संस्था लोकांच्या मदतीला धावल्या. याशिवाय या काळात डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेविका यांच कार्य तर बहुमूल्य ठरले. या अशा अनेक परिस्थितीचा सामना करत आलेल्या परिस्थितीला स्वीकारत कोरोनाशी आनंदाने जुळवून घ्यायला शिकले. हे सर्व सामान्य लोकांचे आयुष्य झाले. पण दिव्यांगांच्या बाबतीत परिस्थिती अतिशय कठीण होती. त्यांना आणि त्यांच्या पालकांचे कोरोना आणि टाळेबंदीचे गणित समजेनासे झाले आहे. दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नसल्याने त्यांची व त्यांच्या पालकांची मानसिकता समजून घ्यायला हवी.

आता सामाजिक अंतर ठेवून वागणे, सतत मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता हे सर्व बदल स्वीकारणे जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत.

- मीना क्षीरसागर,

मुख्याध्यापक,

विश्वास गतिमंद मुलांसाठीचे केंद्र,

ठाणे