शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus : मीरा भाईंदरमध्ये कोरोना स्फोट; 8 महिन्यातील उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 23:23 IST

"मास्क न घालणाऱ्या राजकारणी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा"

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला असून रविवारी तब्बल २९५ नवे रुग्ण सापडले. गेल्या ८ महिन्यातील हा उच्चांक आहे. तर शनिवारी २३४ असे दोन दिवसात ५२९ नवे रुग्ण सापडले आहेत . कोरोना नियमांचे पालन खुद्द पालिका अधिकारी आणि राजकारणीच करत नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली जात आहे . 

मीरा भाईंदर महापालिका पदाधिकारी, प्रशासनाचे बहुतांश अधिकारी - कर्मचारी, नगरसेवक व राजकारणी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन चालवले आहे . अगदी महापौर, आयुक्त ,  उपमहापौर, सभागृह नेता आदी पदाधिकारी, अधिकारी - कर्मचारी आदी राजरोस विना मास्क मिरवत आहेत. खुद्द प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणीच मास्क लावत नसल्याने शहरातील बहुतांश नागरिकांनीदेखील मास्क लावणे सोडून दिले आहे का? असा प्रश्न केला जात आहे. 

ओमायक्रॉनचा धोका वाढल्यानंतरही मास्क न लावण्याचा मस्तवालपणा शहरात प्रशासनातील अधिकारी आणि राजकारणी यांनी सुरूच ठेवला आहे. त्यातूनच मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणेदेखील पालिकेने बंद करून टाकले. लोकांना नियम पाळण्याचे उपदेश  देणारे राजकारणी आणि अधिकारी स्वतः मात्र विना मास्क फिरत असल्याने कोरोना संसर्ग रोखायचा तरी कोणी व कसा? असे सवाल जागरूक नागरिक करू लागले आहे.   

मास्क न लावण्याचा बेजबाबदारपणा आता अंगलट येऊ लागला असून शनिवाच्या एका दिवसात २३४ नवे कोरोना रुग्ण सापडले. तर आज रविवारी तब्बल २९५ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले असतानादेखील महापालिकेने नियमांचे पालन करण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत. शहरात मास्क न लावता फिरणारे आणि बाजारांमध्ये होणारी गर्दी पाहता त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही . 

मुळात या सर्वांस महापौर, आयुक्त, पालिका पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, राजकारणी आदी जबाबदार असून त्यांनीच मास्क घालणे बंद केले व नियमांचे उल्लंघन सातत्याने केल्याने शहरात कोरोनाचा स्फोट झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल करावा व दंड वसूल करा, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस