शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 12:23 AM

कल्याण शहरातील घटना

कल्याण : पश्चिमेतील जोशीबागमधील एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गणेशोत्सवात हे कुटुंब एकत्र आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता केडीएमसीच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

जोशीबागेतील चार मजली इमारतीत एका व्यावसायिकाचे ४० जणांचे कुटुंब एकत्र राहते. या कुटुंबीयांनी दीड दिवसांचा गणपती बसविला होता. यावेळी उत्सवासाठी सगळे जमले होते. या कुटुंंबात सगळे जण एकत्र स्वयंपाक करतात. तसेच एकत्र जेवतात. गणेशोत्सवात कुटुंबातील एकाला कोरोनाची लक्षणे दिसली. त्याची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ३३ जणांची चाचणी केली असता ३० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी १३ जणांना मेट्रो तर, १७ जणांना ए अ‍ॅण्ड जी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४० वरपोहोचली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उपचाराअंती २६ हजार ११२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत ६६५ जणांचा मृत्यू आहे.

नियम धाब्यावर : अनलॉक-४ मध्ये जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. सरकारी व खाजगी कार्यालयेही अधिक मनुष्यबळाने सुरू झाली आहेत. त्यामुळे वाहने रस्त्यावर येऊ लागल्याने ठिकठिकाणी कोंडी होत आहे. मात्र, अनेक जण मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण