शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

कोपर दिशेकडील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाचा थंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:36 IST

डिझाइन मंजुरीबाबतही घातला होता घोळ

कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने तो बंद करण्यात आला असला तरी या पुलाच्या कामाची निविदा काढण्यातील अडसर अद्याप दूर झालेला नाही. रेल्वेकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेने सातत्याने पाठपुरावा करुनही त्याला रेल्वे प्रशासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कोपर पुलाचे काम लांबणीवर पडणार आहे.

कोपर दिशेला उड्डाणपुलाच्या उभारणीचे डिझाइन रेल्वेकडे १७ आॅक्टोबरला पाठवले होेते. त्यांच्याकडून त्याला मंजुरी दिली जात नसल्याने पुढील कार्यवाही महापालिकेस करता येत नव्हती. रेल्वेकडून दखल घेतली जात नसल्याने मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर डिझाइनला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ८ नोव्हेंबरला या डिझाइनला मंजुरी दिली गेली. त्यानंतर निविदा काढण्याचा मार्ग मोकळा होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेने कोपर पूल तोडण्याची अनुमती मागितली होती. त्याला रेल्वेकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचबरोबर रेल्वे उड्डाणपूल कशा प्रकारे पाडायचा याबाबत रेल्वेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. याशिवाय कोपर पुलासाठी रेल्वेने ५० टक्के व महापालिकेने ५० टक्के रक्कम भरावी, याबाबत महापालिकेकडून रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्रालाही रेल्वेकडून अद्याप उत्तर दिले गेलेले नाही. खर्चाचा भार कोणी किती उचलायचा याचे ठरल्यानंतरच निविदा किती खर्चाची काढायची यावर निर्णय घेतला जाणार आहे. रेल्वेकडून पुन्हा काही उत्तर मिळाले नसल्याने कोपर पुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

कल्याणमध्ये स्कायवॉकची केली पाहणी

कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक ते गुरुदेव हॉटेलच्या दिशेने असलेल्या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरू आहे. त्याची प्राथमिक पाहणी मंगळवारी करण्यात आली. अंतिम पाहणी येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. त्यानंतर हा स्कायवॉक दुरुस्त करायचा की तोडून नव्याने तयार करायचा याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. स्कायवॉकची निर्मिती २००८ मध्ये सुरु झाली होती. तर, २०१० तो सुरू झाला.मात्र अवघ्या नऊ वर्षांत स्कायवॉकचे लेखापरीक्षण करण्याची वेळ आली आहे. स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्याने ही वेळ आली आहे, असे बोलले जाते.

‘त्या’ पुलाची डागडुजी होणार

कल्याण ते कसारा मार्गावर रेल्वे मार्गाला समांतर उल्हास नदीवरील पूल हा धोकादायक झाला आहे की नाही याचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे काम महापालिकेने एका संस्थेला दिले होते. त्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला असून तो धोकादायक नसून त्याची डागडुजी करण्याची गरज आहे. आॅडीट अहवालानुसार सुचवलेल्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाईल . त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना देवनपल्ली-कोळी यांनी दिली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRaju Patilराजू पाटीलMNSमनसे