शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

अंबरनाथमध्ये नाल्यात झाली बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 11:40 PM

पालिकेचे दुर्लक्ष : टाकला जात आहे सर्रास मातीचा भराव, शहरवासीयांना बसतोय फटका

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक नाले अरूंद करून त्या ठिकाणी मातीचा भराव करत वाढीव बांधकामे केली आहेत. कल्याण-बदलापूर रस्त्याला लागून असलेला समांतर नाला हा ४० फुटावरून अवघ्या १५ फुटाचा झाला आहे. त्यामुळे मागच्याबाजूला पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.

नगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका आता शहरवासियांना बसत आहे. शहरातील मुख्य नाले रूंद करण्याऐवजी आहे त्या नाल्यांचे संरक्षण करण्यात पालिका कमी पडत आहे. त्यामुळे पावसात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढत आहे. कल्याण-बदलापूर मार्गावरील मोठा नाला हा ३० ते ४० फूट रूंद होता. मात्र या नाल्याशेजारी असलेल्या कंपन्यांनी तो नाला अरूंद केला. काही ठिकाणी मातीचा भराव केला. त्यातील काही भागात नाला थेट वळविण्याचे काम करण्यात आले आहे. तर पोलीस ठाणे ते महात्मा गांधी विद्यालयापर्यंतचा नाला हा दुकानदारांनी वाढीव बांधकाम करून अरूंद केला आहे. तर काही दुकानदारांनी थेट भिंत उभारून नाल्यात अतिक्रमण केले आहे. सुमारे १० ते १५ नाले या दुकानदारांनी व्यापले आहेत. त्यामुळे समांतर रस्त्याचा नाला हा अरूंद झाला आहे. या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग अरूंद झाला आहे. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १ समोरील नाल्याचीही हीच अवस्था झाली आहे. त्या ठिकाणीही भराव करून नाला अरूंद केला आहे. हाच प्रकार भास्करनगर भागात आणि संजयनगर भागात देखील झाला आहे. मोरीवली गावाला लागून असलेल्या नाल्याशेजारीही भराव टाकून नाला अरूंद केला आहे. या नाल्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे.येथे झाले सर्वाधिक अतिक्रमणकल्याण-बदलापूर रस्त्याला लागून असलेल्या नाल्यावर सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. १० ते १५ फुटांचे दुकान आज नाल्यात अतिक्रमण करुन थेट ३० ते ४० फूट रूंद करण्यात आले आहे. ४० फुटांचा नाला हा १५ फुटांचा झाला आहे तर १५ फुटांचे दुकान आज ४० फुटांचे झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असतानाही पालिका प्रशासन नाल्यावरील बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे