शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचे सत्ताधारी आणि प्रशासनासोबत संगनमत, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 20:17 IST

Mira Bhayandar News : कोट्यवधी रुपयांचा दिलेला ठेका रद्द करून बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराने बंद पाडली असून शहरातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारासोबत सत्ताधारी आणि प्रशासनाचे अर्थपूर्ण संगनमत असल्याने चौकशी करावी. कोट्यवधी रुपयांचा दिलेला ठेका रद्द करून बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तर ठेकेदाराने पगार दिला नाही म्हणून कर्मचारी देखील धरणे धरून आहेत. 

मीरा भाईंदर महापालिकेने बससेवा चालवण्यासाठी नेमलेल्या भागीरथी एमबीएमटी या ठेकेदाराला महापालिकेने मोफत बस व अत्याधुनिक डेपो आदी सर्व दिलेले असताना पालिका त्याला प्रति किमी २६ रुपये देखील देते. तिकीटाचे उत्पन्न, जाहिरातीचे पैसे देखील ठेकेदाराचे घेतो. ठेकेदाराचे इतके लाड का? असा सवाल नागरिक आधीपासून करत असताना दुसरीकडे ठेकेदाराने शहरातील बससेवा अजूनही सुरू केलेली नाही. 

कोरोनामुळे  कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी तसेच परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी बस सेवा चालवली  जात होती. चाललेल्या बसप्रमाणे ठेकेदारास पालिकेने पैसे दिले. परंतु ठेकेदाराने पुरवणी करार करून विविध खर्च व कामाचे अतिरिक्त पैसे मागितले. तर कोरोना काळात मोजक्याच कर्मचाऱ्याने बोलावून काम दिले बहुतांश कर्मचाऱ्यांना नाही असा आरोप करत मार्च - एप्रिल पासूनच पगार कर्मचारी मागत आहेत. त्यासाठी त्यांनी सातत्याने धरणे आंदोलन केली. आत देखील २४ सप्टेंबरपासून बसडेपोच्या बाहेर कर्मचारी धरणे धरून आहेत.

पालिकेने सतत सांगून देखील ठेकेदाराने बससेवा सुरू केली नाही. १४ ऑगस्ट पासून केवळ उत्तन मार्गावर ५ बस सुरू केल्या त्या देखील ८ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्या. जेणे करून शहरातील नागरिकांचे पालिकेची बस नसल्याने प्रचंड हाल होत असून त्यांना नाईलाजाने रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. सर्वात जास्त हाल तर उत्तन - पाली - चौक वासियांचे होत आहेत.  

पालिका प्रशासनाने मोठ्या जोशात सांगितले होते की, ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली असून ठेका रद्द करून पालिका बस चालवेल. पगारासाठी धरणे धरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील पालिकेने बस सुरू केली तर आम्ही सहकार्य करू अशी भूमिका घेतली. पालिकेने कर्मचाऱ्याने सोबत बैठका घेऊन देखील घुमजाव करत पुन्हा ठेकेदारासच बस सेवा चालवण्यास दिली. परंतु कर्मचाऱ्यांनी पगारासाठी धरणे धरले तर ठेकेदार बससेवा सुरू करू शकलेला नाही. 

आमदार सरनाईक व आमदार गीता यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांचे ठेकेदाराशी संगनमत असल्याने ठेका रद्द करून पालिकेने बससेवा सुरू केली नाही. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने ठेका रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

सत्ताधारी भाजपाची काही मंडळीच ठेकेदाराच्या फायद्यासाठी धावपळ करत असून महासभेत देखील त्यांनी ठेकेदारांची पाठराखण केली असल्याचे सरनाईक म्हणाले. महापौर ज्योत्सना हसनाळे ह्यांनी देखील आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपायुक्त अजित मुठे, नगरसेवक सचिन म्हात्रे,  ठेकेदार मनोहर सकपाळ यांच्या सोबत भेट घेतली. महापौरांनी देखील, ठेकेदार व प्रशासनाने तातडीने तोडगा काढून नागरिकांसाठी परिवहन सेवा सुरु करा अन्यथा मला माझा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे