शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

राष्ट्रवादीत सामील झालेल्या काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 23:59 IST

भिवंडी महानगरपालिकेच्या ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ४७ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षातील १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडीच्या पारड्यात आपलं मतदान करीत सत्तेत सहभाग घेतला होता.

भिवंडी - महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करत कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या व आता राष्ट्रवादीत सामील झालेल्या १८ नगरसेवकांना कोकण आयुक्तांकडून दिलासा मिळाला आहे. या १८ नगरसेवकांविरोधात काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, या याचिकेची अखेरची सुनावणी शुक्रवारी होती. या सुनावणीत कोकण आयुक्तांनी या १८ नगरसेवकांच्या विरोधातील याचिका फेटाळली आहे. हि याचिका फेटाळल्याने बंडखोर १८ नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.               भिवंडी महानगरपालिकेच्या ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ४७ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षातील १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडीच्या पारड्यात आपलं मतदान करीत सत्तेत सहभाग घेतला होता. त्या विरोधात काँग्रेस नगरसेवक माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे कॉंग्रेस नगरसेवकांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल करून नगरसेवक पदावरून बडतर्फ  करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर कोकण विभागीय आयुक्तांनी निकाल देताना बंडखोरी विरोधात दाखल याचिका फेटाळून लावली.या निकालाने बंडखोरांच्या गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यानच्या काळात या सर्व बंडखोर नगरसेवकांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भिवंडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू उपमहापौर इम्रान वली खान माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी यांसह बंडखोर नगरसेवकांनी समर्थकांसह महानगरपालिका मुख्यालयाबाहेर गाण्याच्या तालावर नृत्य करीत आनंद सोहळा साजरा केला. या निकालाने भिवंडी पालिका वर्तुळात काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चपराक लगावली असल्याचे बोलले जाते.           विशेष म्हणजे कोकण विभागीय आयुक्तांकडील याचिकेवर निकाल देण्यास उशीर होत असल्याने माजी महापौर जावेद दळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर ३१ डिसेंबरपर्यंत निकाल घेण्याचे आदेश उच्च न्यायलायने दिले होते. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस