शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत सामील झालेल्या काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 23:59 IST

भिवंडी महानगरपालिकेच्या ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ४७ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षातील १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडीच्या पारड्यात आपलं मतदान करीत सत्तेत सहभाग घेतला होता.

भिवंडी - महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करत कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या व आता राष्ट्रवादीत सामील झालेल्या १८ नगरसेवकांना कोकण आयुक्तांकडून दिलासा मिळाला आहे. या १८ नगरसेवकांविरोधात काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, या याचिकेची अखेरची सुनावणी शुक्रवारी होती. या सुनावणीत कोकण आयुक्तांनी या १८ नगरसेवकांच्या विरोधातील याचिका फेटाळली आहे. हि याचिका फेटाळल्याने बंडखोर १८ नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.               भिवंडी महानगरपालिकेच्या ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ४७ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षातील १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडीच्या पारड्यात आपलं मतदान करीत सत्तेत सहभाग घेतला होता. त्या विरोधात काँग्रेस नगरसेवक माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे कॉंग्रेस नगरसेवकांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल करून नगरसेवक पदावरून बडतर्फ  करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर कोकण विभागीय आयुक्तांनी निकाल देताना बंडखोरी विरोधात दाखल याचिका फेटाळून लावली.या निकालाने बंडखोरांच्या गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यानच्या काळात या सर्व बंडखोर नगरसेवकांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भिवंडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू उपमहापौर इम्रान वली खान माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी यांसह बंडखोर नगरसेवकांनी समर्थकांसह महानगरपालिका मुख्यालयाबाहेर गाण्याच्या तालावर नृत्य करीत आनंद सोहळा साजरा केला. या निकालाने भिवंडी पालिका वर्तुळात काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चपराक लगावली असल्याचे बोलले जाते.           विशेष म्हणजे कोकण विभागीय आयुक्तांकडील याचिकेवर निकाल देण्यास उशीर होत असल्याने माजी महापौर जावेद दळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर ३१ डिसेंबरपर्यंत निकाल घेण्याचे आदेश उच्च न्यायलायने दिले होते. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस