शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 4:48 AM

देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.

ठाणे - देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी प्रकाशाच्या मार्गातून भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले.राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी (कवाडे गट) आणि समाजवादी पार्टी या आघाडीच्या कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार सभेत ते बोलत होते. मध्यंतरी भारताने सहा बॉलमध्ये १८ रन बनवले. त्यावेळी शेवटच्या बॉलवर षटकार खेचून जसा भारताचा विजय झाला. त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांनी शेवटच्या बॉलवर नाही, तर एक बॉल राखून विजयी षटकार मारावा. जिल्ह्यातील आघाडीचे असलेले वैभव आपल्याच चुकांमुळे गेले आहे. त्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. आता, कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीतून आघाडीचा उमेदवार मुल्ला यांचा विजय हा भविष्यातील लोकसभेपाठोपाठ असलेल्या विधानसभेसाठी प्रकाशमार्ग ठरणार आहे.तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे जिल्ह्यात चारही खासदार निवडून येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.काँग्रेस इच्छुक होतीकोकण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष इच्छुक होता. त्यासाठी आपण प्रयत्न केले. पण, नजीब उभा राहत असल्याने आपण माघार घेतली, असे मत काँग्रेसचे ठामपा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवले.गद्दारांना धडा शिकवेल - जितेंद्र आव्हाड२०१९ मध्ये सत्तापरिवर्तन होईल. याचे चित्र आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत दिसत आहे. तसेच मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नसते. तसेच हे राज्य गद्दारांना धडा शिकवणारे आहे. गेल्या काही दिवसांत देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अंसतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच, मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा करून विकासाचा मुद्दा हे सरकार बाजूला करत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यशवंत हाप्पे, माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, महेंद्र पवार, असलम खान, माजी महापौर मनोहर साळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस