शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मीरा-भार्इंदरमध्ये करवाढीविरोधात काँग्रेस, मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:11 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले. भाजपाला एकहाती सत्ता मिळविल्याचा माज आला असून, त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यांनी बहुमताच्या जोरावर मालमत्ता करासह पाणीपट्टीत दरवाढ करून नवीन घनकचरा शुल्क सामान्य नागरिकांच्या माथी मारले.तसेच भाडेतत्त्वावरील मालमत्ता करांत कपात करून व्यावसायिकांना झुकते माप दिले. भाजपाच्या या दुजाभावामुळे नागरिकांवर दरवर्षी वाढीव कराच्या माध्यमातून सुमारे १ ते दीड हजार रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. भाजपाने आपल्या कार्यकाळात नागरिकांना अच्छे दिन नव्हे तर बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे. सरकारी अनुदानात मिळालेले शेकडो कोटींचे सरकारी अनुदान विकासकामांसाठी मिळालेले असताना ते गेले कुठे, असा आरोप करीत काँग्रेस व मनसेने काळ्या फिती लावून करवाढीविरोधात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडले. यावेळी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.आंदोलनात काँग्रेसच्या माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, महिला जिल्हाध्यक्ष लीला पाटील, गटनेता जुबेर इनामदार, नगरसेवक राजीव मेहरा, अश्रफ शेख, माजी नगरसेविका सुनीता पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश राजपुरोहित, पदाधिकारी फारुक शेख, अंकुश मालुसरे, उमर कपूर, राजकुमार मिश्रा तसेच मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहराध्यक्ष शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, महिला शहराध्यक्ष पुतूल अधिकारी, मनविसे रॉबर्ट डिसोझा, सचिन पोपळे आदी पदाधिकारी व कार्यर्त्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :MNSमनसेMira Bhayanderमीरा-भाईंदर