शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 20:24 IST

अच्छे दिनचे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून जनता अनुभवतेय, काँग्रेसची टीका.

"अच्छे दिन चे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले खरे परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून गोरगरीब जनता अनुभवत आहे," अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव तथा महाराष्ट्र सहप्रभारी बी.एम. संदीप यांनी केली. भाईंदरच्या उत्तन येथील महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेस तर्फे जनजागृती अभियानात ते बोलत होते. "देशाचा जीडीपी दर घसरला असला तरी गॅस-डिझेल-पेट्रोल दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करून देशात महागाई वाढवली, बेरोजगारीने युवा वर्ग त्रस्त झाले आहेत, केंद्रीय मंत्री प्रत्येक खात्यात अपयशी ठरले आहेत, देश उभारणीत काँग्रेसची महत्त्वाची भूमिका आम्ही निर्माण केले त्या सरकारी कंपन्या व उद्योग विकण्याचे काम करीत आहेत असा आरोप केला," संदीप यांनी केला.उद्योग-धंदे बंद पडत चालले असून  नोटबंदी सारखे निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी एक वर्ष लावले, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने मोदींना माघार घ्यावी लागली. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यविषयक नियोजन न केल्याने देशात लाखो मृत्यू झाले, काँग्रेस तर्फे "कोविड न्याय" अभियान राबविण्यात येणार असून कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.माजी आमदार मुझफ्फर हुसेन म्हणाले की , मोदी सरकारचे अपयश देशवासीयांना जनजागृती अभियानाद्वारे सांगणार असून चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसला आहे . केवळ भांडवलदार, मोठमोठ्या उद्योगपतींना खुश करण्यासाठी मोदी काम करीत असून  मनमानीने निर्णय घेतले गेल्याने देश रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा