शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 20:24 IST

अच्छे दिनचे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून जनता अनुभवतेय, काँग्रेसची टीका.

"अच्छे दिन चे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले खरे परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून गोरगरीब जनता अनुभवत आहे," अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव तथा महाराष्ट्र सहप्रभारी बी.एम. संदीप यांनी केली. भाईंदरच्या उत्तन येथील महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेस तर्फे जनजागृती अभियानात ते बोलत होते. "देशाचा जीडीपी दर घसरला असला तरी गॅस-डिझेल-पेट्रोल दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करून देशात महागाई वाढवली, बेरोजगारीने युवा वर्ग त्रस्त झाले आहेत, केंद्रीय मंत्री प्रत्येक खात्यात अपयशी ठरले आहेत, देश उभारणीत काँग्रेसची महत्त्वाची भूमिका आम्ही निर्माण केले त्या सरकारी कंपन्या व उद्योग विकण्याचे काम करीत आहेत असा आरोप केला," संदीप यांनी केला.उद्योग-धंदे बंद पडत चालले असून  नोटबंदी सारखे निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी एक वर्ष लावले, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने मोदींना माघार घ्यावी लागली. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यविषयक नियोजन न केल्याने देशात लाखो मृत्यू झाले, काँग्रेस तर्फे "कोविड न्याय" अभियान राबविण्यात येणार असून कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.माजी आमदार मुझफ्फर हुसेन म्हणाले की , मोदी सरकारचे अपयश देशवासीयांना जनजागृती अभियानाद्वारे सांगणार असून चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसला आहे . केवळ भांडवलदार, मोठमोठ्या उद्योगपतींना खुश करण्यासाठी मोदी काम करीत असून  मनमानीने निर्णय घेतले गेल्याने देश रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा