शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अपक्ष आणि बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:13 AM

पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

ठाणे : वेगवेगळ््या पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून मतविभागणी टाळण्यासाठी सोमवारी त्यांनी अर्र्ज मागे घ्यावे, यासाठी त्यांचे मन वळवण्यात येत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना जे उमेदवारीबद्दल निश्ंिचत होते त्यांनी रविवारी प्रचार सुरू केला. वेगवेगळ््या पक्षांनी यानिमित्त आपापल्या कार्यालयांचे उद््घाटन करून प्रचाराचा नारळ फोडला.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतच मुख्य लढत आहे. त्यानंतर तालुक्यानुसार किंवा गट-गणानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, रिपब्लिकन पक्ष, मनसे असे वेगवेगळे पक्ष रिंगणात आहेत. श्रमजीवी संघटनेने शिवसेनेची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला आहे, तर कुणबी सेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांशी समझोता करून उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसनेही त्यांना सहकार्य केले आहे. पण मुरबाडमधील भाजपाच्या नेत्यांनी मात्र मते फोडण्यासाठी आम्ही काँग्रेसला रिंगणात उतरवल्याचा दावा केला आहे. भिवंडी महापालिकेपासून सुरू असलेला शिवसेना- काँग्रेसच्या मैत्रीचा सिलसिला अद्याप या निवडणुकीत प्रत्यक्षात आलेला दिसलेला नाही. मनसेचा जीव छोटा असला, तरी मोजक्या जागा वगळता त्यांनी अजून कोणाला सहकार्य केलेले नाही. रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट भाजपासोबत आहे, तर भारिपने काँग्रेस, राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे. त्यामुळे गट-गणानुसार राजकीय चित्र बदलते आहे. हे मतदारसंघ आकाराला छोटे असल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी व्हावी, यासाठी इच्छुक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवार आणि रविवारी वेगवेगळ््या नेत्यांकडून, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मध्यस्थी करून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी दुपारपर्यंत माघारीची वेळ असल्याने तोवर बंडखोरांचे हवे ते हट्ट पुरवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. कामाची-कंत्राटाची आश्वासने, नोकरी, एखादे पद, प्रसंगी काही रक्कम देऊन बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदीच जमले नाही; तर समाजाचे हित, समाजाचे भले व्हावे, जातीला संधी मिळावी, यासाठी आणाभाका घेतल्या जात आहेत. देवळात किंवा एखाद्या समाजमंदिरात चारचौघांच्या साक्षीने माघारीचा शब्द घेतला जात आहे.भाजपा फोडल्याचा शिवसेनेचा दावाअनगांव : शिवसेनेशी युती करणार असल्याची माहिती पुरवत गोंधळ उडवून देण्याची खेळी करत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राजकीय खळबळ माजवली होती. नंतर शिवसेनेसोबत असलेली श्रमजीवी संघटना फोडली. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, अशी चर्चा असतानाच शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा फोडल्याचा दावा केला. शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सेक्यूलरसोबत युती झाली असतानाच भाजपा, काँग्रेसचे पदाधिकारी पक्षात आल्याने युतीची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढेही शिवसेनेत इनकमिंग सुरूच राहणार असून त्यामुळे भाजपाला जोरका झटका बसल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बाधित शेतकºयांना त्यांचा मोबदला मिळायला हवा. आदिवासींना योजनांचा लाभ मिळायला हवा, यावर प्रचारात भर दिल्याचे पाटील म्हणाले.