शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

काँक्रिटचा रस्ता ठरतोय पालिकेसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 11:48 PM

बैठकीत काढणार तोडगा : मार्किंगवरून बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील जांभूळफाटा ते जांभूळ गावाकडे जाणारा रस्ता हा पालिकेला डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत होत असले, तरी या रस्त्याचे मार्किंग देण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. मात्र, या ठिकाणी दोन बांधकाम व्यावसायिकांचा रस्त्याच्या मार्किंगवरून वाद सुरू आहे. तर, काही स्थानिकांनीही त्याला विरोध केला आहे. त्यामुळे हा रस्ता मार्किंगअभावी रखडला आहे.

या रस्त्याच्या कामाबाबत मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. एमएमआरडीए आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन या रस्त्याचा तिढा सोडविण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेच्या हद्दीतील जांभूळफाटा ते जांभूळ गाव हा रस्ता एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान काही अतिक्रमण तोडावे लागणार असल्याने पालिकेने पुढाकार घेत मार्किंग देऊन त्यानुसार काम करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने सुरुवातीला केलेल्या मार्किंगला विरोध झाल्याने पुन्हा नव्याने मार्किंग देण्यात आले. मात्र, त्या मार्किंगलाही विरोध झाला आहे. विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याला मार्किंग देणे गरजेचे होते. मात्र, अधिकाºयांनी एकाच रस्त्यासाठी दोन मार्किंग दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यातच, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन वेगवेगळे बांधकाम व्यावसायिक असल्याने ते आपल्या जागेतून रस्ता जाणार नाही, याची दक्षता घेत आहे. रस्त्याला लागून असलेली आपली मालकी हक्काची जागा जाणार, या भीतीने आता दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मात्र, याच दबावामुळे रस्त्याचे काम पूर्ण थांबले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाबरोबरच या ठिकाणी रस्त्याला लागून असलेल्या काही घरांचेही नुकसान होणार असल्याने तो प्रश्न निकाली काढणे अवघड जात आहे. रस्ता जांभूळफाटा येथून सुरू करण्याऐवजी जांभूळ गावाच्या दिशेने रस्ता सुरू केल्याने त्यालाही विरोध होत आहे. वादात सापडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर होण्याची गरज आहे.काम लवकरच सुरू होणारयासंदर्भात पालिकेचे शहर अभियंता अशोक पाटील यांना विचारले असता त्यांनी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात एमएमआरडीएचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी यांची बैठक घेऊन या रस्त्यावरील सर्व अडचणी दूर केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :ambernathअंबरनाथFarmerशेतकरी