शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 06:39 IST

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

- नारायण जाधवठाणे : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याबाबत, गेल्या २० वर्षांपासून अनेकदा आंदोलने झाली. यावर उपाय म्हणून अखेर मच्छीमारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा समितीचा उतारा शोधला आहे. यानुसार, कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन अधिकारी डॉ. विवेक वर्तक यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश असलेली नऊसदस्यीय समिती गुरुवारी स्थापन केली आहे.विशेष म्हणजे यापूर्वीही विभागाने दोनदा समित्यांचे गठण करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. मात्र, तरीही खाडीतील प्रदूषण आणि कमी होणारे मत्स्योत्पादन आणि त्यामुळे उद्भवणाºया मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यास मत्स्यव्यवसाय विभागास अपयश आले आहे.महाराष्ट्र शासनाने बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै २०१४ रोजी डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छीमार शिक्षा संस्थान वर्सोवा-अंधेरी (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.त्यानंतर, निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि पीएनपीकडून होणाºया प्रदूषणासाठी पुन्हा एकदा २४ फेबु्रवारी २०१६ रोजी आणखी एक समिती नेमण्यात आली. आता पुन्हा डॉ. विवेक वर्तक यांच्या अध्यक्षतेखील समिती नेमली आहे.साडेतीन हजार मच्छीमारांवर गदानिप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेटी व बार्जेसद्वारे मालवाहतूक करते. यामुळे धरमतर खाडीच्या १३५ मीटर रु ंदीच्या मध्यवर्ती पट्ट्यात जलवाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. ही परवानगीच आता पेण व अलिबाग तालुक्यांतील ४८ गावांतील सुमारे साडेतीन हजार स्थानिक मच्छीमारांच्या जीवावर उठली आहे.मिठागरे, भातशेती संकटातमालवाहू बार्जेस व स्पीड बोटींची दिवसरात्र चालणारी रेलचेल, कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण वाढून मत्स्योत्पादनाबरोबरच लाटांच्या प्रहारामुळे फुटणारी समुद्रतटीय खारभूमी, संरक्षक बंधारे, नापीक भातशेती अशा असंख्य समस्या सदर भागात उद्भवल्या आहेत.समितीची कार्यकक्षाया समितीस खाडीत जलप्रदूषण वाढले आहे काय, मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे काय, बाधित कुटुंबांची संख्या व झालेले नुकसान, धरमतर खाडीसह आसपासच्या किनाºयांच्या प्रदूषणात औद्योगिक सांडपाण्यामुळे वाढ झाली आहे काय, बाधित माशांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठीच्या उपायांचा अहवाल दोन टप्प्यांत सादर करावयाचे आहेत.

टॅग्स :IndiaभारतMumbaiमुंबई