शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 06:39 IST

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

- नारायण जाधवठाणे : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याबाबत, गेल्या २० वर्षांपासून अनेकदा आंदोलने झाली. यावर उपाय म्हणून अखेर मच्छीमारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा समितीचा उतारा शोधला आहे. यानुसार, कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन अधिकारी डॉ. विवेक वर्तक यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश असलेली नऊसदस्यीय समिती गुरुवारी स्थापन केली आहे.विशेष म्हणजे यापूर्वीही विभागाने दोनदा समित्यांचे गठण करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. मात्र, तरीही खाडीतील प्रदूषण आणि कमी होणारे मत्स्योत्पादन आणि त्यामुळे उद्भवणाºया मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यास मत्स्यव्यवसाय विभागास अपयश आले आहे.महाराष्ट्र शासनाने बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै २०१४ रोजी डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छीमार शिक्षा संस्थान वर्सोवा-अंधेरी (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.त्यानंतर, निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि पीएनपीकडून होणाºया प्रदूषणासाठी पुन्हा एकदा २४ फेबु्रवारी २०१६ रोजी आणखी एक समिती नेमण्यात आली. आता पुन्हा डॉ. विवेक वर्तक यांच्या अध्यक्षतेखील समिती नेमली आहे.साडेतीन हजार मच्छीमारांवर गदानिप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेटी व बार्जेसद्वारे मालवाहतूक करते. यामुळे धरमतर खाडीच्या १३५ मीटर रु ंदीच्या मध्यवर्ती पट्ट्यात जलवाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. ही परवानगीच आता पेण व अलिबाग तालुक्यांतील ४८ गावांतील सुमारे साडेतीन हजार स्थानिक मच्छीमारांच्या जीवावर उठली आहे.मिठागरे, भातशेती संकटातमालवाहू बार्जेस व स्पीड बोटींची दिवसरात्र चालणारी रेलचेल, कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण वाढून मत्स्योत्पादनाबरोबरच लाटांच्या प्रहारामुळे फुटणारी समुद्रतटीय खारभूमी, संरक्षक बंधारे, नापीक भातशेती अशा असंख्य समस्या सदर भागात उद्भवल्या आहेत.समितीची कार्यकक्षाया समितीस खाडीत जलप्रदूषण वाढले आहे काय, मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे काय, बाधित कुटुंबांची संख्या व झालेले नुकसान, धरमतर खाडीसह आसपासच्या किनाºयांच्या प्रदूषणात औद्योगिक सांडपाण्यामुळे वाढ झाली आहे काय, बाधित माशांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठीच्या उपायांचा अहवाल दोन टप्प्यांत सादर करावयाचे आहेत.

टॅग्स :IndiaभारतMumbaiमुंबई