शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 06:39 IST

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

- नारायण जाधवठाणे : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याबाबत, गेल्या २० वर्षांपासून अनेकदा आंदोलने झाली. यावर उपाय म्हणून अखेर मच्छीमारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा समितीचा उतारा शोधला आहे. यानुसार, कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन अधिकारी डॉ. विवेक वर्तक यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश असलेली नऊसदस्यीय समिती गुरुवारी स्थापन केली आहे.विशेष म्हणजे यापूर्वीही विभागाने दोनदा समित्यांचे गठण करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. मात्र, तरीही खाडीतील प्रदूषण आणि कमी होणारे मत्स्योत्पादन आणि त्यामुळे उद्भवणाºया मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यास मत्स्यव्यवसाय विभागास अपयश आले आहे.महाराष्ट्र शासनाने बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै २०१४ रोजी डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छीमार शिक्षा संस्थान वर्सोवा-अंधेरी (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.त्यानंतर, निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि पीएनपीकडून होणाºया प्रदूषणासाठी पुन्हा एकदा २४ फेबु्रवारी २०१६ रोजी आणखी एक समिती नेमण्यात आली. आता पुन्हा डॉ. विवेक वर्तक यांच्या अध्यक्षतेखील समिती नेमली आहे.साडेतीन हजार मच्छीमारांवर गदानिप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेटी व बार्जेसद्वारे मालवाहतूक करते. यामुळे धरमतर खाडीच्या १३५ मीटर रु ंदीच्या मध्यवर्ती पट्ट्यात जलवाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. ही परवानगीच आता पेण व अलिबाग तालुक्यांतील ४८ गावांतील सुमारे साडेतीन हजार स्थानिक मच्छीमारांच्या जीवावर उठली आहे.मिठागरे, भातशेती संकटातमालवाहू बार्जेस व स्पीड बोटींची दिवसरात्र चालणारी रेलचेल, कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण वाढून मत्स्योत्पादनाबरोबरच लाटांच्या प्रहारामुळे फुटणारी समुद्रतटीय खारभूमी, संरक्षक बंधारे, नापीक भातशेती अशा असंख्य समस्या सदर भागात उद्भवल्या आहेत.समितीची कार्यकक्षाया समितीस खाडीत जलप्रदूषण वाढले आहे काय, मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे काय, बाधित कुटुंबांची संख्या व झालेले नुकसान, धरमतर खाडीसह आसपासच्या किनाºयांच्या प्रदूषणात औद्योगिक सांडपाण्यामुळे वाढ झाली आहे काय, बाधित माशांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठीच्या उपायांचा अहवाल दोन टप्प्यांत सादर करावयाचे आहेत.

टॅग्स :IndiaभारतMumbaiमुंबई