शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

२७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेबाबत सुनावणीनंतर निर्णय घेणार- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 3:59 PM

२७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते.

कल्याण: कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या २७ गावांचे नगर परिषदेत रूपांतर करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे आज आणि उद्या अशी दोन दिवस सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सरकार याबाबतीत सकारात्मक असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. विधान परिषदेचे सदस्य जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले, किरण पावसकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच बोलावलेल्या, सर्व संबंधितांच्या बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. तेथेही उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असेही ते म्हणाले.

या २७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. यासंदर्भात ११ व १२ मार्च, म्हणजेच आज व उद्या सुनावणी सुरू असून या सुनावणी संदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवाल मिळाल्यानंतर,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत तातडीने निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या २७ गावांसाठी नगरपरिषद गठित करण्यासाठी प्रारूप अधिसूचनेचा मसुदा  ०७ सप्टेंबर २०१५ रोजीच प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नागरी सुविधांच्या मुद्द्यावरून या सत्तावीस गावांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर या गावांचा विकास होत नसल्याने त्यासाठी येथे स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केली जावी अशी मागणी या गावातील नागरिकांनी स्थापन केलेल्या संघर्ष समितीने केली होती. या २७ गावांतील नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही नगरविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी