शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

विधिमंडळात लवकरच घेणार २७ गावांवर निर्णय, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर यासंदर्भात लवकरच विधिमंडळ अधिवेशनात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह चंद्रकांत पाटील, शिवराम गायकर, गजानन मांगरूळकर, बळीराम तरे, विजय भाने, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे उपस्थित होते. संघर्ष समितीने यावेळी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. महापालिकेत गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना छुप्या पद्धतीने काढण्यात आली होती. त्यानंतर लगेच गावे वेगळी करण्यासाठी सप्टेंबर २०१५ मध्ये अधिसूचना काढली. तिची अंमलबजावणी करुन, हरकती सूचना मागवल्या. त्यामुळे पुन्हा हरकती मागवण्याची गरज नाही. यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्यात यावा. या गावांचा विकास महापालिकेत होणार नाही, याकडे समितीने लक्ष वेधले. महाविकास आघाडीचे सरकार येताच २७ गावांच्या मागणीसंदर्भात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. त्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रश्नाला सरकारकडून प्राधान्य दिले जात असून, याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली.>मागणीविषयी सरकार सकारात्मकया बैठकीत आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, स्वतंत्र नगरपालिका करताना शासनाने त्यासाठी विशेष निधी द्यावा. त्यासाठी इमारत व कर्मचारीवर्ग असणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा विचार करून स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी, असे ते म्हणाले. त्यास आमदार गणपत गायकवाड यांनी दुजोरा दिला. लोकभावना लक्षात घेत सरकार २७ गावांच्या मागणीविषयी सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत सभागृहात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.