शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विधिमंडळात लवकरच घेणार २७ गावांवर निर्णय, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर यासंदर्भात लवकरच विधिमंडळ अधिवेशनात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह चंद्रकांत पाटील, शिवराम गायकर, गजानन मांगरूळकर, बळीराम तरे, विजय भाने, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे उपस्थित होते. संघर्ष समितीने यावेळी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. महापालिकेत गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना छुप्या पद्धतीने काढण्यात आली होती. त्यानंतर लगेच गावे वेगळी करण्यासाठी सप्टेंबर २०१५ मध्ये अधिसूचना काढली. तिची अंमलबजावणी करुन, हरकती सूचना मागवल्या. त्यामुळे पुन्हा हरकती मागवण्याची गरज नाही. यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्यात यावा. या गावांचा विकास महापालिकेत होणार नाही, याकडे समितीने लक्ष वेधले. महाविकास आघाडीचे सरकार येताच २७ गावांच्या मागणीसंदर्भात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. त्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रश्नाला सरकारकडून प्राधान्य दिले जात असून, याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली.>मागणीविषयी सरकार सकारात्मकया बैठकीत आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, स्वतंत्र नगरपालिका करताना शासनाने त्यासाठी विशेष निधी द्यावा. त्यासाठी इमारत व कर्मचारीवर्ग असणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा विचार करून स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी, असे ते म्हणाले. त्यास आमदार गणपत गायकवाड यांनी दुजोरा दिला. लोकभावना लक्षात घेत सरकार २७ गावांच्या मागणीविषयी सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत सभागृहात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.