शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पालघरला पुढील आठवडा ढगाळ हवामानाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:53 IST

कृषी सल्ला : शेतपिकाचे कीडरोगापासून संरक्षण गरजेचे : जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्याचीही शक्यता

बोर्डी : पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडून तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आर्द्रता आणि तापमानातही घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे कीडरोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव आणि हवामान तज्ज्ञ प्रा. रिझवाना सय्यद यांनी केले आहे.ढगाळ हवामानात भाजीपाला तसेच फळपिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने योग्य कीटकनाशके तथा बुरशीनाशकांची फवारणी हवामान कोरडे आणि वाऱ्याची गती कमी असताना करावी. काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वारा, पाऊस यामुळे खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही.वांगी, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांमध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुड्यांसारख्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकरी २५ ते ३० पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत. वेलवर्गीय भाज्यांना मांडवाचा किंवा काठीचा आधार द्यावा. ढगाळ वातावरणामुळे कोबीवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासाठी २.५ ग्रॅम काॅपरऑक्सिक्लोराईड १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर संरक्षणासाठी ३ मिली इमिडाक्लोप्रीड तसेच २० ग्रॅम बाविस्टीन पावडर १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सातत्याने बदलत राहणाऱ्या हवामानामुळे पीक संरक्षणासाठी जैविक कीड व रोगनाशकांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.तलासरीत दुसऱ्या दिवशीही अवकाळी  तलासरी भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे भातपिकांबरोबर गवत पावलीही वाया गेली. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, त्यात पावसाच्या अनियमितपणामुळे आधीच भातपीक वाया गेले. जे काही भात पीक हाताशी आले, त्याची कापणी करून झोडणी करण्याच्या वेळेस पाऊस शुक्रवारपासून सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या भाताचे, गवत पावलीचेही नुकसान झाले. मच्छीमार बांधवांचे कोट्यवधीचे नुकसान डहाणू ते झाई या समुद्रकिनारी गावांमध्ये मच्छीमारी व्यवसाय केला जातो. येथे ऑक्टोबर महिन्यापासून सुक्या मच्छीच्या व्यवसायाला प्रारंभ होतो. यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने मासळी सुकविण्याच्या कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. या पावसाने डहाणू खाडी येथे सुकत घातलेले बोंबील, जवळा आणि अन्य माशांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. आगामी काही दिवस तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तविण्यात आल्याने भिजलेली सुकी मच्छी कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन पंचक्रोशीतील गावांमध्ये कुजकट वास येणार आहे.