शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पालघरला पुढील आठवडा ढगाळ हवामानाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:53 IST

कृषी सल्ला : शेतपिकाचे कीडरोगापासून संरक्षण गरजेचे : जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्याचीही शक्यता

बोर्डी : पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडून तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आर्द्रता आणि तापमानातही घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे कीडरोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव आणि हवामान तज्ज्ञ प्रा. रिझवाना सय्यद यांनी केले आहे.ढगाळ हवामानात भाजीपाला तसेच फळपिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने योग्य कीटकनाशके तथा बुरशीनाशकांची फवारणी हवामान कोरडे आणि वाऱ्याची गती कमी असताना करावी. काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वारा, पाऊस यामुळे खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही.वांगी, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांमध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुड्यांसारख्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकरी २५ ते ३० पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत. वेलवर्गीय भाज्यांना मांडवाचा किंवा काठीचा आधार द्यावा. ढगाळ वातावरणामुळे कोबीवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासाठी २.५ ग्रॅम काॅपरऑक्सिक्लोराईड १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर संरक्षणासाठी ३ मिली इमिडाक्लोप्रीड तसेच २० ग्रॅम बाविस्टीन पावडर १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सातत्याने बदलत राहणाऱ्या हवामानामुळे पीक संरक्षणासाठी जैविक कीड व रोगनाशकांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.तलासरीत दुसऱ्या दिवशीही अवकाळी  तलासरी भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे भातपिकांबरोबर गवत पावलीही वाया गेली. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, त्यात पावसाच्या अनियमितपणामुळे आधीच भातपीक वाया गेले. जे काही भात पीक हाताशी आले, त्याची कापणी करून झोडणी करण्याच्या वेळेस पाऊस शुक्रवारपासून सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या भाताचे, गवत पावलीचेही नुकसान झाले. मच्छीमार बांधवांचे कोट्यवधीचे नुकसान डहाणू ते झाई या समुद्रकिनारी गावांमध्ये मच्छीमारी व्यवसाय केला जातो. येथे ऑक्टोबर महिन्यापासून सुक्या मच्छीच्या व्यवसायाला प्रारंभ होतो. यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने मासळी सुकविण्याच्या कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. या पावसाने डहाणू खाडी येथे सुकत घातलेले बोंबील, जवळा आणि अन्य माशांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. आगामी काही दिवस तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तविण्यात आल्याने भिजलेली सुकी मच्छी कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन पंचक्रोशीतील गावांमध्ये कुजकट वास येणार आहे.