शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:44 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे.

- राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे. त्यात थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी पालिका मुख्यालयात केले होते.पालिकेने प्रामुख्याने आयुक्तांनी यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात गतवेळपेक्षा वरचा क्रमांक मिळविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी स्वच्छतेचे मोबाईल अ‍ॅपदेखील सुरू केले असून, त्यावर नागरिकांनी स्वच्छतेप्रती समाधान व्यक्त करायचे आहे. स्वच्छतेचा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सर्वांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी धावपळ करीत असून ते मोबाईल अॅप डाऊनलोड करणा-याचा मोबाईल क्रमांक व स्वाक्षरीची नोंद करून त्याचा अहवाल प्रशासनाला दररोज सादर करीत आहेत. त्या अहवालाच्या पडताळणी कामासाठी देखील अधिका-यांना जुंपण्यात आले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, शिक्षक, व्यापारी व ज्येष्ठ नागरिक संघटना, गृहनिर्माण संस्था आदींमध्ये कार्यशाळा आयोजित करून लोकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे.या स्वच्छतेप्रति प्रशासनाने शहरातील नगरसेवकांची १७ नोव्हेंबरला नगरभवन सभागृहात येथील कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी एकूण ९५ पैकी केवळ दोनच नगरसेवकांनी हजेरी लावल्याने नगरसेवकांची स्वच्छतेप्रति असलेली भावना त्यावेळी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर आयुक्तांनी पुढाकार घेत शुक्रवारी पालिका मुख्यालयात नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. मात्र त्यालाही सुरुवातीला नगरसेवकांनी बेताची उपस्थिती लावली. मात्र अधिका-यांनी सतत संपर्क साधल्यानंतर काही नगरसेवकांचे आगमन सुरू झाले. यानंतरही ९५ पैकी सुमारे ४० नगरसेवकांनी कार्यशाळेला हजेरी लावली. या कार्यशाळेत उपस्थित नगरसेवकांना स्क्रीनद्वारे स्वच्छतेची माहिती देण्यात आली. यावेळी प्रशासनाने नगरसेवकांना स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छतेच्या विविध प्रकारांना देण्यात येणा-या गुणांकनाविषयाची माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.जास्तीत जास्त लोकांना स्वच्छतेच्या मोबाईल अ‍ॅपचे डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन नगरसेवकांना करण्यात आले. यावेळी ज्या नगरसेवकांकडुन त्यांच्या प्रभागातील १०० टक्के स्वच्छतेचे काम केले जाईल त्या प्रभागाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा देखील करण्यात आली. मात्र प्रभागांत कायम असलेली अस्वच्छता अनेकदा तक्रार करूनही स्वच्छ केली जात नसल्याचा सूर अनेक नगरसेवकांनी आळवला.सेनेच्या नगरसेविका स्नेहा पांडे यांनी तर भार्इंदर पुर्वेच्या आझादनगर (स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित असलेली जागा) येथील अस्वच्छतेवर आसूड ओढीत या घाणीचे साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी एका लहान मुलीची अत्याचारानंतर हत्या तर दोन दिवसांपूर्वी एका मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला तेथीलच कच-यात फेकण्यात आले. यामुळे प्रशासनाने पसरलेली घाण साफ न करताच स्वच्छतेचा बडेजाव करु नये, असे प्रशासनाला सुनावले. यावेळी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रवकिशोर पाटील, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक