शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपद्वारे अस्वच्छतेची तक्रार केल्यास १२ तासांत स्वच्छता करणार; पालिका आयुक्तांची विद्यार्थ्यांना ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 18:55 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत बुधवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

राजू काळे 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत बुधवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ साठी मोबईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलेल्या स्वच्छता-मोहुआ या अ‍ॅपद्वारे सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेची फोटासह तक्रार केल्यास येत्या १२ तासांत ती स्वच्छ केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी विद्यार्थ्यांना दिली. 

शहरात आजही अस्वच्छता पसरवली जात असली तरी त्यात पुर्वीपेक्षा घट झाल्याचा दावा प्रशासनाकडुन केला जात आहे. पालिका मुख्यालयासह इतर वास्तूंमधील शौचालये दुर्गंधीयुक्त तसेच बकाल अवस्थेत असली तरी त्याची दुरुस्ती अद्याप केली जात नाही. ओला व सुका कचय््रााचे वर्गीकरण अद्याप प्रशासनाच्या प्रयत्नांना यश देत नाही. कारण नागरीकांनी वर्गीकरणानुसार जमा केलेला कचरा एकत्रितपणेच गोळा केला जात असल्याचे दिसुन येत आहे. तसेच सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांतुन कचरागाडीचे आगमन होते. त्यादरम्यान कचराकुंडी अथवा डब्यात साठविलेला सुका कचरा परिसरात पुन्हा पसरतो. प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर शहर १०० टक्के हणगदारी मुक्त झाल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी शौचालये बांधण्यात आली असुन त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी सुमारे २० ते २२ अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.

मात्र तेथील स्वच्छता सर्व्हेक्षणावेळी वर्षातुन एकदाच पाहिली जात असल्याने नावापुरती असलेली स्वच्छता काय कामाची, असा प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित केला जात आहे. यातील १०० टक्के कचरा वर्गीकरण व हगणदारीमुक्तीनेच शहरातील स्वच्छतेचा गतवर्षीच्या सर्व्हेक्षणात घात केल्याचे सिद्ध झाल्याने यंदाही त्याचा अडसर दुर करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्नील असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील स्वच्छतेची पाहणी केंद्र सरकारच्या पथकाद्वारे जानेवारी २०१८ मध्ये होण्याची शक्यता गृहित धरुन आयुक्तांनी सर्व शाळा, महाविद्यालयांत स्वच्छतेचा संदेश देणाय््राा कार्यशाळेचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने भार्इंदर पुर्वेकडील शंकर नारायण महाविद्यालयात बुधवारी स्वच्छतेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आयुक्तांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे प्राप्त तक्रारीवर १२ तासांत कार्यवाही करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. तसेच हे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांना मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, प्राचार्या रंजना पाटील, शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक