शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

तलावांच्या दुरवस्थेला नागरिकही तितकेच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:16 IST

बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे

ठाणे - बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. केडीएमसीच्या या तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले होते. प्रारंभी घरगुती गणपतींच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावातील वाढते प्रदूषण पाहता स्थानिक रहिवाशांनी दाखल झालेल्या याचिकेवर हरित लवादाने मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. यामुळे गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, छट पूजेच्या निमित्ताने होणारे विसर्जन थांबले असले तरी तलावात कचरा टाकणे सुरूच आहे. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलाव परिसराला डम्पिंगची अवकळा प्राप्त झाली आहे.

प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहाराद्वारे तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले गेले आहे. परंतु इच्छाशक्तीच्या अभावात ही समस्या आजपर्यंत जैसे थे राहिली आहे. हा तलाव प्रदूषणमुक्त राहावा तसेच त्याचे सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने विविध खाजगी संस्था पुढाकार घ्यायला तयार आहेत यासंदर्भातले पत्र मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये केडीएमसीला देण्यात आले होते. परंतु त्या पत्रावरही आजतागायत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु २७ गावांचा भाग असलेला एमआयडीसी मिलापनगर हा केडीएमसीत राहतो की महापालिकेबाहेर जातो, या शक्यतेमुळे तलावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यावर मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे तसेच प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून मागील काही वर्षांत कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जात आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भक्तांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मागील वर्षी कल्याणमध्ये चार तर डोंबिवलीत १२ अशा एकूण १६ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. कल्याणमध्ये वायलेनगर येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात, कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामागे, चिंचपाडा येथील १०० फुटी रोडजवळ, तर जरीमरी तलावातील विसर्जन बंद करण्यात आल्यामुळे कल्याण पूर्वेकडील अयोध्यानगरी येथे अशा चार ठिकाणी कल्याणमध्ये भक्तांसाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यातआले होते.तर डोंबिवलीत पेंडसेनगर पंचायत विहीर, नेहरू मैदान, मानपाडा रस्त्याजवळ अयोध्यानगर येथे, शिवम रु ग्णालयाजवळ, टिळकनगर विद्यामंदिरजवळ, न्यू आयरे रोड येथील उदंचन पंपिंगजवळ, प्रगती कॉलेजजवळ, कस्तुरी प्लाझा, आयरे रोड येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळ, एमआयडीसीमधील अभिनव स्कूलजवळ, तर डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील आनंदनगर येथे आणि भागशाळा मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यंदाही याच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. नैसर्गिक तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय ठरत असलातरी त्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावरखर्च होत असल्याचे बोलले जाते.टीका करताना चार बोटे आपल्याकडेशहराच्या दुरवस्थेला आपण नेहमी अधिकारी, प्रशासन, राजकीय मंडळींना दोषी ठरवतो. अर्थात यात तथ्य आहे. मात्र दुसºयांवर टीकेची झोड उठवताना चार बोटे नेहमी आपल्याकडे असतात हे सामान्यांनी विसरता कामा नये. यासाठी शहर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे, हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका