शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

तलावांच्या दुरवस्थेला नागरिकही तितकेच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:16 IST

बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे

ठाणे - बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. केडीएमसीच्या या तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले होते. प्रारंभी घरगुती गणपतींच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावातील वाढते प्रदूषण पाहता स्थानिक रहिवाशांनी दाखल झालेल्या याचिकेवर हरित लवादाने मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. यामुळे गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, छट पूजेच्या निमित्ताने होणारे विसर्जन थांबले असले तरी तलावात कचरा टाकणे सुरूच आहे. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलाव परिसराला डम्पिंगची अवकळा प्राप्त झाली आहे.

प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहाराद्वारे तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले गेले आहे. परंतु इच्छाशक्तीच्या अभावात ही समस्या आजपर्यंत जैसे थे राहिली आहे. हा तलाव प्रदूषणमुक्त राहावा तसेच त्याचे सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने विविध खाजगी संस्था पुढाकार घ्यायला तयार आहेत यासंदर्भातले पत्र मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये केडीएमसीला देण्यात आले होते. परंतु त्या पत्रावरही आजतागायत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु २७ गावांचा भाग असलेला एमआयडीसी मिलापनगर हा केडीएमसीत राहतो की महापालिकेबाहेर जातो, या शक्यतेमुळे तलावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यावर मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे तसेच प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून मागील काही वर्षांत कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जात आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भक्तांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मागील वर्षी कल्याणमध्ये चार तर डोंबिवलीत १२ अशा एकूण १६ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. कल्याणमध्ये वायलेनगर येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात, कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामागे, चिंचपाडा येथील १०० फुटी रोडजवळ, तर जरीमरी तलावातील विसर्जन बंद करण्यात आल्यामुळे कल्याण पूर्वेकडील अयोध्यानगरी येथे अशा चार ठिकाणी कल्याणमध्ये भक्तांसाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यातआले होते.तर डोंबिवलीत पेंडसेनगर पंचायत विहीर, नेहरू मैदान, मानपाडा रस्त्याजवळ अयोध्यानगर येथे, शिवम रु ग्णालयाजवळ, टिळकनगर विद्यामंदिरजवळ, न्यू आयरे रोड येथील उदंचन पंपिंगजवळ, प्रगती कॉलेजजवळ, कस्तुरी प्लाझा, आयरे रोड येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळ, एमआयडीसीमधील अभिनव स्कूलजवळ, तर डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील आनंदनगर येथे आणि भागशाळा मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यंदाही याच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. नैसर्गिक तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय ठरत असलातरी त्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावरखर्च होत असल्याचे बोलले जाते.टीका करताना चार बोटे आपल्याकडेशहराच्या दुरवस्थेला आपण नेहमी अधिकारी, प्रशासन, राजकीय मंडळींना दोषी ठरवतो. अर्थात यात तथ्य आहे. मात्र दुसºयांवर टीकेची झोड उठवताना चार बोटे नेहमी आपल्याकडे असतात हे सामान्यांनी विसरता कामा नये. यासाठी शहर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे, हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका