शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

तलावांच्या दुरवस्थेला नागरिकही तितकेच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:16 IST

बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे

ठाणे - बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. केडीएमसीच्या या तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले होते. प्रारंभी घरगुती गणपतींच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावातील वाढते प्रदूषण पाहता स्थानिक रहिवाशांनी दाखल झालेल्या याचिकेवर हरित लवादाने मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. यामुळे गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, छट पूजेच्या निमित्ताने होणारे विसर्जन थांबले असले तरी तलावात कचरा टाकणे सुरूच आहे. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलाव परिसराला डम्पिंगची अवकळा प्राप्त झाली आहे.

प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहाराद्वारे तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले गेले आहे. परंतु इच्छाशक्तीच्या अभावात ही समस्या आजपर्यंत जैसे थे राहिली आहे. हा तलाव प्रदूषणमुक्त राहावा तसेच त्याचे सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने विविध खाजगी संस्था पुढाकार घ्यायला तयार आहेत यासंदर्भातले पत्र मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये केडीएमसीला देण्यात आले होते. परंतु त्या पत्रावरही आजतागायत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु २७ गावांचा भाग असलेला एमआयडीसी मिलापनगर हा केडीएमसीत राहतो की महापालिकेबाहेर जातो, या शक्यतेमुळे तलावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यावर मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे तसेच प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून मागील काही वर्षांत कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जात आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भक्तांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मागील वर्षी कल्याणमध्ये चार तर डोंबिवलीत १२ अशा एकूण १६ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. कल्याणमध्ये वायलेनगर येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात, कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामागे, चिंचपाडा येथील १०० फुटी रोडजवळ, तर जरीमरी तलावातील विसर्जन बंद करण्यात आल्यामुळे कल्याण पूर्वेकडील अयोध्यानगरी येथे अशा चार ठिकाणी कल्याणमध्ये भक्तांसाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यातआले होते.तर डोंबिवलीत पेंडसेनगर पंचायत विहीर, नेहरू मैदान, मानपाडा रस्त्याजवळ अयोध्यानगर येथे, शिवम रु ग्णालयाजवळ, टिळकनगर विद्यामंदिरजवळ, न्यू आयरे रोड येथील उदंचन पंपिंगजवळ, प्रगती कॉलेजजवळ, कस्तुरी प्लाझा, आयरे रोड येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळ, एमआयडीसीमधील अभिनव स्कूलजवळ, तर डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील आनंदनगर येथे आणि भागशाळा मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यंदाही याच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. नैसर्गिक तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय ठरत असलातरी त्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावरखर्च होत असल्याचे बोलले जाते.टीका करताना चार बोटे आपल्याकडेशहराच्या दुरवस्थेला आपण नेहमी अधिकारी, प्रशासन, राजकीय मंडळींना दोषी ठरवतो. अर्थात यात तथ्य आहे. मात्र दुसºयांवर टीकेची झोड उठवताना चार बोटे नेहमी आपल्याकडे असतात हे सामान्यांनी विसरता कामा नये. यासाठी शहर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे, हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका