शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तलावांच्या दुरवस्थेला नागरिकही तितकेच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:16 IST

बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे

ठाणे - बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. केडीएमसीच्या या तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले होते. प्रारंभी घरगुती गणपतींच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावातील वाढते प्रदूषण पाहता स्थानिक रहिवाशांनी दाखल झालेल्या याचिकेवर हरित लवादाने मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. यामुळे गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, छट पूजेच्या निमित्ताने होणारे विसर्जन थांबले असले तरी तलावात कचरा टाकणे सुरूच आहे. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलाव परिसराला डम्पिंगची अवकळा प्राप्त झाली आहे.

प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहाराद्वारे तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले गेले आहे. परंतु इच्छाशक्तीच्या अभावात ही समस्या आजपर्यंत जैसे थे राहिली आहे. हा तलाव प्रदूषणमुक्त राहावा तसेच त्याचे सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने विविध खाजगी संस्था पुढाकार घ्यायला तयार आहेत यासंदर्भातले पत्र मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये केडीएमसीला देण्यात आले होते. परंतु त्या पत्रावरही आजतागायत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु २७ गावांचा भाग असलेला एमआयडीसी मिलापनगर हा केडीएमसीत राहतो की महापालिकेबाहेर जातो, या शक्यतेमुळे तलावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यावर मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे तसेच प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून मागील काही वर्षांत कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जात आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भक्तांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मागील वर्षी कल्याणमध्ये चार तर डोंबिवलीत १२ अशा एकूण १६ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. कल्याणमध्ये वायलेनगर येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात, कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामागे, चिंचपाडा येथील १०० फुटी रोडजवळ, तर जरीमरी तलावातील विसर्जन बंद करण्यात आल्यामुळे कल्याण पूर्वेकडील अयोध्यानगरी येथे अशा चार ठिकाणी कल्याणमध्ये भक्तांसाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यातआले होते.तर डोंबिवलीत पेंडसेनगर पंचायत विहीर, नेहरू मैदान, मानपाडा रस्त्याजवळ अयोध्यानगर येथे, शिवम रु ग्णालयाजवळ, टिळकनगर विद्यामंदिरजवळ, न्यू आयरे रोड येथील उदंचन पंपिंगजवळ, प्रगती कॉलेजजवळ, कस्तुरी प्लाझा, आयरे रोड येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळ, एमआयडीसीमधील अभिनव स्कूलजवळ, तर डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील आनंदनगर येथे आणि भागशाळा मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यंदाही याच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. नैसर्गिक तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय ठरत असलातरी त्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावरखर्च होत असल्याचे बोलले जाते.टीका करताना चार बोटे आपल्याकडेशहराच्या दुरवस्थेला आपण नेहमी अधिकारी, प्रशासन, राजकीय मंडळींना दोषी ठरवतो. अर्थात यात तथ्य आहे. मात्र दुसºयांवर टीकेची झोड उठवताना चार बोटे नेहमी आपल्याकडे असतात हे सामान्यांनी विसरता कामा नये. यासाठी शहर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे, हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका