शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:08 AM

प्राधिकरण अपयशी; चिखलोलीतून सहा दशलक्ष लीटर पुरवठा बंद

अंबरनाथ : जीवन प्राधिकरणाने येथील चिखलोली धरणातून पाणी उचलणे बंद केल्याने त्याचा थेट फटका हा अंबरनाथ शहराला बसत आहे. थेट सहा दशलक्ष लीटर पाणी कमी झाल्याने प्राधिकरणाने एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ पूर्व भागाला वळविले आहे. त्यामुळे पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे चिखलोलीतून जो पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्या प्रमाणात एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळत नसल्याने पूर्व भागालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणी दूषित असल्याचे कारण पुढे करत प्राधिकरणाने धरणातून होणारा सहा दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा बंद केला. या धरणातून नवरेनगर आणि महालक्ष्मीनगर परिसरापर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्यावर या धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसीकडून अतिरीक्त सहा दशलक्ष लीटर पाणी घेणे गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी हे वाढीव पाणी देण्यास तयार नसल्याने आता उपलब्ध पाण्यावरच सर्व शहराची तहान भागविण्याचे काम प्राधिकरणाला करावे लागत आहे. मात्र, ते करत असताना शहराच्या दोन्ही भागांना मुबलक पाणी देण्यात प्राधिकरण सक्षम नाही. पश्चिम भागाला जो पुरवठा केला जात आहे, त्यातील दोन ते तीन दशलक्ष लीटर पाणी थेट पूर्व भागाला वळविण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.चिखलोली धरणाच्या पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यात प्राधिकरण सक्षमपणे काम करत नाही, तर दुसरीकडे एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी राजकीय प्रभाव पाडण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. वाढीव पाणी मिळत नसल्याने आता जावसई, फुलेनगर, कमलाकरनगर, कोहोजगांव, नालंदानगर, नारायणनगर या भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाकडे मुबलक पाणी नसल्याने प्राधिकरणाचे अधिकारीही हातवर करत आहेत. त्यामुळे या पाण्याच्या समस्येबाबत कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न पडला आहे.पाण्याचे नियोजन करण्यात प्राधिकरणाला अपयश आले आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी पाणी वळविण्याचे काम करीत आहेत. एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, तेच काम केले जात नाही.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याची समस्या ही आजची नाही. जीवन प्राधिकरणाने पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. पाणीपुरवठा वळविण्यात आल्याने पश्चिम भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.     - चरण रसाळ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई