शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

शाळांमध्ये चिमुकल्यांची किलबिल पुन्हा झाली सुरू; महापालिका क्षेत्रांतील शाळा बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:28 IST

जिल्ह्यात ४२२ शाळा सुरू, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत.

ठाणे : कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास वर्षभरापासून बंद असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून बुधवारपासून सुरू झाल्या. यात शहरी भाग वगळून पहिल्या दिवशी ४२२ शाळा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा २७ जानेवारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत. या शाळा खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद आदी स्वरूपातील व्यवस्थापनाच्या आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी ३४५ प्राथमिक शाळा तर ७७ माध्यमिक शाळा सुरू झाल्या. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.. शिक्षकांनादेखील खबरदारी म्हणून कोविड चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. सर्व शाळांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिले आहेत.

फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत भातसानगर, मुरबाड : ग्रामीण भागातील शाळांमध्ये बुधवारी पुन्हा घंटा वाजली. पहिल्याच दिवशी शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. बऱ्याच दिवसांनी मित्रमैत्रिणी भेटल्याने त्यांच्या चहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळांनी फुलांचा वर्षाव करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.  शाळांमध्ये कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळले गेले होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत आले होते. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे शाळा सुरु करावी अशी मागणी केली जात होती. म. ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी व फुलांचा वर्षाव करून वर्गात सोडण्यात येत होते. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी बसविण्यात आले होते. परिस्थिती पूर्णपणे आवाक्यात आल्यानंतर सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरवणार असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटपमुरबाड तालुक्यातील २१० शाळा सुरु झाल्या. या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने सर्व शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले. शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शीला लंबाटे यांनी दिली.

 

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस