शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शाळांमध्ये चिमुकल्यांची किलबिल पुन्हा झाली सुरू; महापालिका क्षेत्रांतील शाळा बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:28 IST

जिल्ह्यात ४२२ शाळा सुरू, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत.

ठाणे : कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास वर्षभरापासून बंद असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून बुधवारपासून सुरू झाल्या. यात शहरी भाग वगळून पहिल्या दिवशी ४२२ शाळा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा २७ जानेवारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत. या शाळा खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद आदी स्वरूपातील व्यवस्थापनाच्या आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी ३४५ प्राथमिक शाळा तर ७७ माध्यमिक शाळा सुरू झाल्या. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.. शिक्षकांनादेखील खबरदारी म्हणून कोविड चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. सर्व शाळांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिले आहेत.

फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत भातसानगर, मुरबाड : ग्रामीण भागातील शाळांमध्ये बुधवारी पुन्हा घंटा वाजली. पहिल्याच दिवशी शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. बऱ्याच दिवसांनी मित्रमैत्रिणी भेटल्याने त्यांच्या चहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळांनी फुलांचा वर्षाव करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.  शाळांमध्ये कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळले गेले होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत आले होते. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे शाळा सुरु करावी अशी मागणी केली जात होती. म. ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी व फुलांचा वर्षाव करून वर्गात सोडण्यात येत होते. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी बसविण्यात आले होते. परिस्थिती पूर्णपणे आवाक्यात आल्यानंतर सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरवणार असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटपमुरबाड तालुक्यातील २१० शाळा सुरु झाल्या. या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने सर्व शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले. शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शीला लंबाटे यांनी दिली.

 

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस