शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मोबाइल गेममुळे मुले हिंसक; डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 00:36 IST

पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ही बाब घातक असल्याने त्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळेने पालक उद्बोधन सभा घेतली. त्यामध्ये गेममुळे मेंदूच्या पेशींवर होणारा परिणाम आणि त्यातून घडणारे मानसिक आणि वर्तनातील बदलांचे समुपदेशकांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून पालकांना पुढील धोक्यांची जाणीव करून दिली.मोबाइल गेममुळे अनेक अनुचित घटना रोजच कानांवर पडत असतात. त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणारी टिळकनगर ही पहिली शाळा ठरली आहे. मुले हिंसक का वागतात? यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला. त्यामध्ये विभक्त कुटुंबपद्धती, आईवडिलांतील वाद, घटस्फोट, एकल पालकत्व, अतिलाड याव्यतिरिक्त मोबाइल व आॅनलाइन गेममुळे मुलांच्या वर्तनात बदल होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.पाचवी आणि नववीचे विद्यार्थी पबजी, फ्री फायर आणि तत्सम गेम्स किती प्रमाणात खेळतात, हे शिक्षकांनी त्यांच्याकडूनच जाणून घेतले. याबाबत, विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी मन मोकळे केले. या गेमच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षकही आश्चर्यचकित झाले. सद्सद्विवेकबुद्धी नष्ट करणाऱ्या आणि थ्रील अनुभवण्यासाठी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यायला भाग पडणाºया या गेमचा अभ्यास करण्याच्या सूचना शाळेने शिक्षकांना केल्या होत्या. त्यानुसार प्रज्ञा बापट, लीना ठाकूर, मनीषा केंद्रे, लीना दाणी यांनी विविध गेमची माहिती, लेख, विविध माध्यमांतून जमा केली. त्यावरून एक प्रकल्प तयार करून शुक्रवारी पालकांसाठी उद्बोधन सभा घेतली. पाचवी ते आठवी आणि आठवी ते नववी अशा दोन सत्रांत ही सभा झाली. शाळेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मोबाइलपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी शाळेने सतत असे उपक्रम राबवायला हवेत, असे संस्थेचे कार्यवाहक डॉ. महेश ठाकूर म्हणाले.घातक गेमवर भारतातही बंदी हवी‘एकुलत्या एक मुलांना हवे ते द्या’ या वृत्तीमुळे पालकांचे मुलांच्या वर्तनातील बदलाकडे दुर्लक्ष होत आहे. या फेºयातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी जपान, चीन यासारख्या पूर्वेतील देशांनी घातक मोबाइल गेमवर बंदी घातली आहे.याप्रमाणे भारतातही बंदी आणली पाहिजे. तसेच पालक आणि शिक्षकांनीही जबाबदारी घेऊ न मुलांशी सतत याविषयी बोलायला हवे. चांगले नागरिक घडवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत टिळकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.पालकच आपल्या मुलांना मोबाइल देतात. त्यानंतर, त्यांना गेम खेळण्याची सवय लागते. अनेक विद्यार्थी तर शाळेत जाण्यासाठी रिक्षाला दिलेले पैसे सायबर कॅफेत जाऊ न खर्च करतात आणि दांडी मारतात. त्यांनी यावेळी गेममुळे मेंदूच्या पेशींवर ताण पडून मुले हिंसक बनत आहेत.- श्वेता बंगाली, समुपदेशक, टिळकनगर शाळा

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे