शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मोबाइल गेममुळे मुले हिंसक; डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 00:36 IST

पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ही बाब घातक असल्याने त्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळेने पालक उद्बोधन सभा घेतली. त्यामध्ये गेममुळे मेंदूच्या पेशींवर होणारा परिणाम आणि त्यातून घडणारे मानसिक आणि वर्तनातील बदलांचे समुपदेशकांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून पालकांना पुढील धोक्यांची जाणीव करून दिली.मोबाइल गेममुळे अनेक अनुचित घटना रोजच कानांवर पडत असतात. त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणारी टिळकनगर ही पहिली शाळा ठरली आहे. मुले हिंसक का वागतात? यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला. त्यामध्ये विभक्त कुटुंबपद्धती, आईवडिलांतील वाद, घटस्फोट, एकल पालकत्व, अतिलाड याव्यतिरिक्त मोबाइल व आॅनलाइन गेममुळे मुलांच्या वर्तनात बदल होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.पाचवी आणि नववीचे विद्यार्थी पबजी, फ्री फायर आणि तत्सम गेम्स किती प्रमाणात खेळतात, हे शिक्षकांनी त्यांच्याकडूनच जाणून घेतले. याबाबत, विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी मन मोकळे केले. या गेमच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षकही आश्चर्यचकित झाले. सद्सद्विवेकबुद्धी नष्ट करणाऱ्या आणि थ्रील अनुभवण्यासाठी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यायला भाग पडणाºया या गेमचा अभ्यास करण्याच्या सूचना शाळेने शिक्षकांना केल्या होत्या. त्यानुसार प्रज्ञा बापट, लीना ठाकूर, मनीषा केंद्रे, लीना दाणी यांनी विविध गेमची माहिती, लेख, विविध माध्यमांतून जमा केली. त्यावरून एक प्रकल्प तयार करून शुक्रवारी पालकांसाठी उद्बोधन सभा घेतली. पाचवी ते आठवी आणि आठवी ते नववी अशा दोन सत्रांत ही सभा झाली. शाळेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मोबाइलपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी शाळेने सतत असे उपक्रम राबवायला हवेत, असे संस्थेचे कार्यवाहक डॉ. महेश ठाकूर म्हणाले.घातक गेमवर भारतातही बंदी हवी‘एकुलत्या एक मुलांना हवे ते द्या’ या वृत्तीमुळे पालकांचे मुलांच्या वर्तनातील बदलाकडे दुर्लक्ष होत आहे. या फेºयातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी जपान, चीन यासारख्या पूर्वेतील देशांनी घातक मोबाइल गेमवर बंदी घातली आहे.याप्रमाणे भारतातही बंदी आणली पाहिजे. तसेच पालक आणि शिक्षकांनीही जबाबदारी घेऊ न मुलांशी सतत याविषयी बोलायला हवे. चांगले नागरिक घडवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत टिळकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.पालकच आपल्या मुलांना मोबाइल देतात. त्यानंतर, त्यांना गेम खेळण्याची सवय लागते. अनेक विद्यार्थी तर शाळेत जाण्यासाठी रिक्षाला दिलेले पैसे सायबर कॅफेत जाऊ न खर्च करतात आणि दांडी मारतात. त्यांनी यावेळी गेममुळे मेंदूच्या पेशींवर ताण पडून मुले हिंसक बनत आहेत.- श्वेता बंगाली, समुपदेशक, टिळकनगर शाळा

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे