शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 6:40 PM

‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले

ठळक मुद्दे भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षित‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरातजो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

 भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षितलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘भावली धरण’ प्रकल्पातून शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त ९७ गावे २५९ पाड्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १२.६९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या आदेशामुळे आता शहापूरच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यास यश मिळाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले. याचा लाभ शहापूरच्या माळ व दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्र्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा दोन लाख लोकवस्तीच्या गावेपाडे आदी ९७ गावे व २५९ आदिवासी पाड्यांना आता हक्काचे पाणी मिळणार आहे.धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे अनके वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी जलसंपदा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या तालुक्यातील गावपाड्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे अशी माहिती भीमनवार यांनी दिली. शहापूर येथील कुणबी महोत्सवाला मुख्यमंत्री आले असता त्यावेळी पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना त्यांनी लक्षात घेत ‘गुरूत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.जो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देणारा शासन निर्णय काढून शहापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील वारंवार आवाज उठवून पाटपुरावा केला असता त्यास यश मिळाले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद