शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

केडीएमसीतील २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 6:09 AM

फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. त्याचप्रमाणे, शहरीकरण झालेली लगतची नऊ गावे मात्र महापालिका क्षेत्रात असतील, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. अखेर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनाद्वारे या गावांबाबतचा निर्णय जाहीर केला. २७ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबत स्थानिकांकडून मागणी केली होती. त्यानंतर, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातून २७ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्यासाठी अधिसूचना जाहीर करत, त्याबाबत हरकती, सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार, कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचना दाखल करण्यात आल्या आणि ११ व १२ मार्च रोजी आयुक्तांनी त्यावर सुनावणी घेतली. कोकण विभागीय आयुक्तांनी १३ मार्च रोजी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शीळ कल्याण रस्त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्यामुळे ही नऊ गावे महानगरपालिका क्षेत्रात कायम राहणार असून, इतर अठरा गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ही ९ गावे राहणार केडीएमसीतआजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडास्वतंत्र नगरपरिषदेत समाविष्ट होणारी गावे : घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे