शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

चव्हाणांना वधारले पवारांना डावलले

By admin | Updated: September 19, 2015 23:33 IST

आमदार रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी निवडणुकीत भाजपाच्या प्रचारप्रमुखपदी मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली. यामुळे चव्हाण यांचा भाव काहीसा वधारला असला तरीही कल्याण

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीआमदार रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी निवडणुकीत भाजपाच्या प्रचारप्रमुखपदी मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली. यामुळे चव्हाण यांचा भाव काहीसा वधारला असला तरीही कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांना डावलल्याचीही चर्चा आहे. २७ गावांमुळे पवार चर्चेत आले असले तरी त्यांनी विरोधकही तेवढेच निर्माण केल्याने त्यातल्या त्यात सोबर चेहरा असलेले चव्हाण यांना ते पद देऊन पक्षश्रेष्ठींनी दुहेरी खेळी केली आहे. सकृतदर्शनी जरी हे पद देऊन चव्हाणांना महत्व दिले असे वाटत असले तरीही यामुळे त्यांची जबाबदारी वाढली असून यात जर ते फेल झाले, तर मात्र त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. एकीकडे खासदार कपिल पाटील यांना विभागाध्यक्ष, पवार यांना प्रदेश सचिव अशा विविध जबाबदाऱ्या देताना चव्हाण यांना मात्र डावलण्यात आले आहे का, अशीही चर्चा सर्वत्र होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या शनिवारच्या घोषणेमुळे त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. युतीचा निर्णय जरी पक्षश्रेष्ठी घेणार असले तरीही सध्याच्या वातावरणात केडीएमसीत युती होऊच नये, अशी भूमिका दोन्ही पक्षांची आहे. एरव्ही, युती झाल्यावर विशेषत: महापालिका निवडणुकीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाला नामोहरम करण्यासाठी बंडखोर, अपक्ष उभे करून भाजपाच्या उमेदवारांचे खच्चीकरण करून त्यांस पाडतात, असा सूर भाजपाने आळवला आहे. त्यातच, २७ गावांसंदर्भात शिवसेनेविरुद्धच भूमिका घ्यायची, असा पवित्रा पवार यांनी घेतला होता. त्यात चव्हाण मात्र बाजूला होते. अशातच खासदारकीच्या निवडणुकीत शिंदेंसाठी चव्हाण यांनी दिवसरात्र एक केली होती. त्याचे फळ त्यांना विधानसभेत मिळाले. त्यामुळे जर युती झालीच तर समन्वय साधणारा आणि सेनेकडूनही त्यास तेवढाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. २७ गावांमधील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना केडीएमसीत घेण्यासाठी चव्हाण यांनीच सर्वपक्षीयांना एकत्र केले होते. जर युती झाली नाही तरी शिवसेनेची गळचेपी कुठे करायची, त्यांना कुठे दाबायचे, त्यांच्या उमेदवारांची कशी कोंडी करायची, याचीही गणित-सूत्रे चव्हाण यांना चांगली जमतील. पवार यांच्यापेक्षा चव्हाण हा कोकणी चेहरा असून त्यांचा या निवडणुकीत पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, असे श्रेष्ठींना वाटते. विधानसभेत त्यांनी डोंबिवलीतून शिवसेनेच्या पॉकेट्समधूनही मते काढली. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या मतांना उमेदवाराच्या निवासालगतही त्यांनी खिंडार पाडले होते. 1कोकणी, गुजराती, आगरी, ब्राह्मण, यूपी, याखेरीज समाजातील अन्य नागरिकांना त्यांच्याबाबत जास्त जवळीकता आहे. त्या सर्वांना एकत्रित करण्यात त्यांची हातोटी आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह कल्याणात आले होते, तेव्हा सभेला गर्दी मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची दाद एकनाथ शिंदेंनी दिली होती. खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा निवडून आले, तेव्हा पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम चव्हाण यांचे अभिनंदन करून आलिंगन दिले होेते. 2दुसरीकडे मनसेलाही ते जवळचे असून कल्याण जिल्हाध्यक्ष राजू पाटील, नेते राजन मराठे, राजेश कदम यांच्याशीही त्यांचे सलगीचे संबंध आहेत. काँग्रेसचे नेते शिवाजी शेलार हे त्यांचे मित्र आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नितीन पाटील, विकास म्हात्रे, रणजित जोशी आदींना फोडून भाजपात आणण्यातही त्यांची खेळी मोलाची आहे.