शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गात बिल्डरांच्या हितासाठी केले बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:24 IST

एनए जमीन बळकावण्याचा घाट : शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

सुरेश लोखंडेठाणे : नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गाचा मूळमार्ग बदलून तो बदलापूरमधील चांमटोली गावाच्या हद्दीतील अकृषिक (एनए) जमिनीवरून वळवल्याची गंभीर चर्चा सध्या सुरू आहे. राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेल्या विकासकाच्या भल्यासाठी व त्यांची शाळा, हॉस्पिटल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या एनए जमिनीवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवण्यात आल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात ते ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना साकडे घालून न्यायालयात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत. 

मुंबई ते बडोदा हायवेसाठी कल्याणमधील १३ आणि अंबरनाथ तालुक्यातील १३ गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. बदलापूरसमवेत काही गावांच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी प्रांत कार्यालयासह तहसीलदार आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयातून माहिती मागवण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, त्यापैकी अधिकांश जमिनींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुमारे सात वर्षांपूर्वीच अकृषिक (एनए) दाखले देण्यात आलेले आहेत; मात्र आता मूळच्या मार्गात बदल करून हा मुंबई ते बडोदा राष्ट्रीय महामार्ग बदलापूरजवळील चांमटोली गावाच्या हद्दीतील याच एनए जमिनींवरून वळवण्याचा घाट घातल्याचा आरोप शेतकºयांनी केला. अकृषिकच्या (एनए) दाखल्यावरून संबंधित शेतकºयांच्या बेरोजगार मुलांनीकर्ज काढून लग्नाचे हॉल, हॉटेल व अन्य व्यवसाय उभे केले असून, आता त्या जमिनींवर बडोदा राष्ट्रीय मार्गाचे नोटिफिकेशन आल्याच्या चर्चेमुळे शेतकरी व व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मुंबई-बडोदा या राष्ट्रीय महामार्गाचा आधीच्या नियोजनातील मूळमार्ग जाणीवपूर्वक विकासकांच्या भल्यासाठी वळवल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. विशेष म्हणजे भल्या मोठ्या नैसर्गिक नाल्यातून हा महामार्ग वळवण्यात येत असल्याची चर्चाही शेतकºयांमध्ये आहे. पण, आधीच तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बदलापूरमधील चांमटोली हद्दीत सर्व्हे नंबर १२/११ मधील भाग ९/४ या जमिनीचा एनए दाखला १३ फेब्रुवारी २०१२ रोजी देण्यात आल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०१८ मध्येदेखील रो-हाउससाठी एनए दाखले दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

व्यवसाय बुडण्याची भीतीआश्चर्य म्हणजे मुंबई-बडोदा राजमार्गासाठी अधिसूचना निघाली असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात बाधित होत आहेत, त्या जमिनींवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अकृषिक दाखले कसे देण्यात आले, असा सवालही या शेतकऱ्यांनी केला आहे.हा अकृषिक परवानगी दाखला मिळाल्याने सुशिक्षित तरुण बाळाराम जाधव याने बँकेतून कर्ज घेऊन लग्नाचा मोठा हॉल बांधला आहे. हॉटेलही उभारले आहे. त्यास अनुसरून इतरांनीही अन्य बांधकामे केली आहेत. परंतु, आता या जमिनींवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

... तर नागरी वस्ती जलमय होणारयेथील सर्व्हे नंबर-११ लगत असलेल्या भल्यामोठ्या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. या नाल्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वळवल्यामुळे या परिसरात महाप्रलय होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. बाराही महिने वाहत असलेल्या या नाल्याचा उगम सह्याद्री पर्वतातून होतो.

नैसर्गिक स्त्रोत असलेला हा नाला चांगलाच मोठा आहे. परिसरातील कोपरेचीवाडी, चिचेवली, बॅडशीळ, चिकनेचीवाडी, ताडवडी, दहिवली, वराडेभोज या गावांतून तो रेल्वेलाइन ओलांडून उल्हास नदीत विलीन होतो.

भोज धरणातून होणाºया विसर्गाचे पाणी वाहून नेल्यासाठी तो उपयोगात येत आहे. त्याच्यावर हा महामार्ग वळवल्यास पाण्याचे नैसर्गिक विसर्गस्त्रोत बंद होऊन नागरीवस्तीत महापुराचा धोका संभवण्याची शक्यता या शेतकºयांनी वर्तवली आहे. यास वेळीच आळा घालण्यासाठी ते एकवटले असून हा राष्ट्रीय महामार्ग मूळच्या नियोजित मार्गानेच पुढे न्यावा, त्यास अन्यत्र वळवू नये, यासाठी ते उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईhighwayमहामार्गFarmerशेतकरी