शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गात बिल्डरांच्या हितासाठी केले बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:24 IST

एनए जमीन बळकावण्याचा घाट : शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

सुरेश लोखंडेठाणे : नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गाचा मूळमार्ग बदलून तो बदलापूरमधील चांमटोली गावाच्या हद्दीतील अकृषिक (एनए) जमिनीवरून वळवल्याची गंभीर चर्चा सध्या सुरू आहे. राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेल्या विकासकाच्या भल्यासाठी व त्यांची शाळा, हॉस्पिटल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या एनए जमिनीवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवण्यात आल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात ते ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना साकडे घालून न्यायालयात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत. 

मुंबई ते बडोदा हायवेसाठी कल्याणमधील १३ आणि अंबरनाथ तालुक्यातील १३ गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. बदलापूरसमवेत काही गावांच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी प्रांत कार्यालयासह तहसीलदार आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयातून माहिती मागवण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, त्यापैकी अधिकांश जमिनींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुमारे सात वर्षांपूर्वीच अकृषिक (एनए) दाखले देण्यात आलेले आहेत; मात्र आता मूळच्या मार्गात बदल करून हा मुंबई ते बडोदा राष्ट्रीय महामार्ग बदलापूरजवळील चांमटोली गावाच्या हद्दीतील याच एनए जमिनींवरून वळवण्याचा घाट घातल्याचा आरोप शेतकºयांनी केला. अकृषिकच्या (एनए) दाखल्यावरून संबंधित शेतकºयांच्या बेरोजगार मुलांनीकर्ज काढून लग्नाचे हॉल, हॉटेल व अन्य व्यवसाय उभे केले असून, आता त्या जमिनींवर बडोदा राष्ट्रीय मार्गाचे नोटिफिकेशन आल्याच्या चर्चेमुळे शेतकरी व व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मुंबई-बडोदा या राष्ट्रीय महामार्गाचा आधीच्या नियोजनातील मूळमार्ग जाणीवपूर्वक विकासकांच्या भल्यासाठी वळवल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. विशेष म्हणजे भल्या मोठ्या नैसर्गिक नाल्यातून हा महामार्ग वळवण्यात येत असल्याची चर्चाही शेतकºयांमध्ये आहे. पण, आधीच तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बदलापूरमधील चांमटोली हद्दीत सर्व्हे नंबर १२/११ मधील भाग ९/४ या जमिनीचा एनए दाखला १३ फेब्रुवारी २०१२ रोजी देण्यात आल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०१८ मध्येदेखील रो-हाउससाठी एनए दाखले दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

व्यवसाय बुडण्याची भीतीआश्चर्य म्हणजे मुंबई-बडोदा राजमार्गासाठी अधिसूचना निघाली असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात बाधित होत आहेत, त्या जमिनींवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अकृषिक दाखले कसे देण्यात आले, असा सवालही या शेतकऱ्यांनी केला आहे.हा अकृषिक परवानगी दाखला मिळाल्याने सुशिक्षित तरुण बाळाराम जाधव याने बँकेतून कर्ज घेऊन लग्नाचा मोठा हॉल बांधला आहे. हॉटेलही उभारले आहे. त्यास अनुसरून इतरांनीही अन्य बांधकामे केली आहेत. परंतु, आता या जमिनींवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

... तर नागरी वस्ती जलमय होणारयेथील सर्व्हे नंबर-११ लगत असलेल्या भल्यामोठ्या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. या नाल्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वळवल्यामुळे या परिसरात महाप्रलय होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. बाराही महिने वाहत असलेल्या या नाल्याचा उगम सह्याद्री पर्वतातून होतो.

नैसर्गिक स्त्रोत असलेला हा नाला चांगलाच मोठा आहे. परिसरातील कोपरेचीवाडी, चिचेवली, बॅडशीळ, चिकनेचीवाडी, ताडवडी, दहिवली, वराडेभोज या गावांतून तो रेल्वेलाइन ओलांडून उल्हास नदीत विलीन होतो.

भोज धरणातून होणाºया विसर्गाचे पाणी वाहून नेल्यासाठी तो उपयोगात येत आहे. त्याच्यावर हा महामार्ग वळवल्यास पाण्याचे नैसर्गिक विसर्गस्त्रोत बंद होऊन नागरीवस्तीत महापुराचा धोका संभवण्याची शक्यता या शेतकºयांनी वर्तवली आहे. यास वेळीच आळा घालण्यासाठी ते एकवटले असून हा राष्ट्रीय महामार्ग मूळच्या नियोजित मार्गानेच पुढे न्यावा, त्यास अन्यत्र वळवू नये, यासाठी ते उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईhighwayमहामार्गFarmerशेतकरी