शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अनिष्ट परंपरा हेच संविधानापुढील आव्हान- मुक्ता दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:02 AM

संविधानाची मूल्ये मानणारा समाज घडविण्याची गरज

डोंबिवली : आपल्या समाजात, जातीच्या काही परंपरा आहेत. तोच कायदा आहे, अशी समजूत आहे. त्यामुळे त्या परंपरा तोडणाऱ्याला भावकी शिक्षा सुनवते. हेच भारतीय संविधानासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या कार्यकर्ता मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.‘अनुभूती संस्थे’ने संविधानावर आधारित स्पर्धा घेतली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबडेकर सभागृहात मंगळवारी झाला. यावेळी दाभोलकर बोलत होत्या. यावेळी कवी व स्तंभलेखिका दिशा शेख, युवा कार्यकर्त्या आरती कडे, संस्थेच्या दीपा पवार उपस्थित होत्या.दाभोलकर म्हणाल्या, ‘संविधानाचा आधार घेऊन अनेक गोष्टींचा उच्चार तुम्ही समाजात करू शकता. या समाजातील अनेकांना आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणे गुन्हा वाटतो. गावकीतील लोकांना माणसाच्या आयुष्यातील सर्व गोष्टींचे नियमन करण्याचा अधिकार आहे, असे वाटते. व्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेचा मूलभूत आधार आहे, तरीही लोक त्याला विरोध करतात. आपल्याला सर्वांना संविधानाचा आधार घेऊनच या आव्हानाला तोंड द्यायचे आहे.’दाभोलकर यांनी सांगितले की, ‘मुलामुलींना आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हे संविधानाच्या आधारावर सांगायचे आहे. संविधानाची मूल्ये मानणारा समाज घडविण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. संविधानातील शब्द गूढ व गंभीर आशय घेऊन आलेले आहेत. कलम २१ च्या नव्याने कायदा आला तेव्हा भिन्न लिंग व्यक्तींनी लग्न करायचे, असे कायदा होता. पण समलैंगिकतेला मान्यता कशी मिळाली? एखाद्या व्यक्तीने जगायचे ते आपल्या इच्छेनुसार. त्यामुळे हा कायदा बदलला गेला. ब्रिटिशांनी समलैंगिकतेचा कायदा ठरविला होता. त्यांच्याकडे हा रद्द झाला. तो जुना कायदा भारतात सुरू होता. १९९३ मध्ये उन्नीकृष्णनविरोधात मद्रास अशी एक केस झाली तर त्यात शिक्षण मिळाले तर सन्मानाने जगता येईल, असे सांगितले. त्यानंतर भारतात २००९ मध्ये ‘राईट टू एज्युकेशन’ हा कायदा आला. त्यात ही ० ते ६ आणि १४ वर्षांपुढील मुलांचे शिक्षण त्यात येत नाही. १७ वर्षांची लढाई संविधानातील एक मूल्य प्रत्यक्षात येण्यासाठी आली.’दाभोलकर म्हणाल्या, ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना ३० टक्के आरक्षण मिळाले. आज ते ५० टक्के आहे. ज्यांना देशाच्या सत्तेत वाटा नव्हता त्यांना कायदेशीर वाटा संविधानातून निर्माण झाला. सत्तेवर आलेल्या माणसाने ही सत्ता राबविण्यासाठी सक्षम बनणे, ही पुढील सामाजिक चळवळीची जबाबदारी आहे. संविधानाचा मोठेपणा बाबासाहेबांच्या संविधानाचा अवलंब करू इच्छिणाºयांच्या मोठेपणावर आहे. संविधाननुसार देश चालतो, याचा उच्चार झाला पाहिजे. कारण परंपरेचा पगडा आपल्या देशात आहे. राजस्थानात एक स्त्री सतीबंदी कायद्यानंतर सती गेली. कायदा अस्तित्वात असूनही त्यांची अमंलबजावणी करणे कठीण असते. फक्त कायदा झाल्याने समाजात बदल होणार नाही. संविधानाची ताकद दैनंदिन जीवनात वापरली गेली पाहिजे. प्रत्येक गटाने सणाप्रमाणे संविधान दिन साजरा केला पाहिजे. संविधानाचा विचार हा देश चालवेल हे पुढील पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी संविधान दिन साजरा झाला पाहिजे.... तरीही महिलांना मंदिर प्रवेश नाहीदिशा शेख म्हणाल्या, गौरी लंकेश, दाभोलकर यासारख्या विचारवंताच्या हत्या समाजात होतात. संविधान नसते तर त्या गोष्टी कुठेपर्यंत गेल्या असत्या. संविधान असताना महिलांना मंदिर प्रवेश रोखला जात आहे.बाबासाहेबांनी तळागाळापासून उच्चभ्रूसाठी संविधानात लिहिले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा न देता वायफ ाय सारख्या सुविधामध्ये गुंतवून ठेवले आहे. स्थानकात आज नळ नाही, पण वायफाय सुविधा आहेत.