शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

मध्य रेल्वेकडून महापालिकेसह नागरिक वेठीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:34 IST

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेस कळवण्यात आलेले आहे.

कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेस कळवण्यात आलेले आहे. या पुलाच्या कामाचे टेंडर दोन महिन्यांनंतर काढण्यात येणार आहे. जर कामच दोन महिन्यांनी सुरू होणार असेल, तर दोन महिने आधीच पूल वाहतुकीसाठी बंद ठेवून रेल्वे प्रशासनाकडून महापालिका व नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा मुद्दा स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.सभापती म्हात्रे यांनी यासंदर्भात माहिती दिली की, जुलै २०१८ मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह महापौरांनी कोपर दिशेच्या रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यावेळी महापालिकेचे आयुक्तही सोबत होते. रेल्वेच्या अधिकारीवर्गाने हा पूल धोकादायक नसल्याची माहिती त्यावेळी दिली होती. आता १० महिन्यांनंतर रेल्वेला पूल धोकादायक असल्याचा साक्षात्कार झाला आहे. मध्य रेल्वेस्थानकातील पूल पडण्याच्या दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून २८ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटीकडून करून घेण्यात आले. या अहवालाचा हवाला देत २७ मे पासून कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून महापालिकेस कळवण्यात आले आहे. ज्या अहवालाचा उल्लेख केला आहे, तो अहवाल महापालिकेस रेल्वेने दिलेला नाही. त्याचबरोबर देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची आहे. रेल्वे नागरिकांना पूल बंद करून वेठीस धरत आहे. रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप म्हात्रे यांनी कोपर पूल बंद करण्याच्या मुद्द्यावरून केला आहे. पूल बंद करण्याचे पत्र सात दिवस आधी पालिकेस दिले आहे. मग पर्यायी मार्गाचे नियोजन महापालिका कसे करायचे, असे ते म्हणाले.>कोपर पुलाच्या बंदीवर पर्याय काय?रेल्वेने २७ मे रोजी कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यास ठाकुर्ली रेल्वे फाटक रेल्वेने बंद केले होते. ते खुले करण्यात यावे. डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेला जाणारी वाहने या फाटकातून जातील. तर पूर्वेतून पश्चिमेला येणारी वाहने ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करतील. तसेच आयरेगाव ते कोपर या भागातील रेल्वे क्रॉसिंगही रेल्वेने खुले करून द्यावे. हे दोन पर्याय मान्य केल्याशिवाय रेल्वेने कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करू नये. यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्याच रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.