शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

'धसई' ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा 'पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार' जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 8:50 PM

राज्यातून पुरस्कृत झालेल्या १४ ग्रामपंचायत मध्ये ठाणे जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतचा समावेश झाला असून जिल्ह्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने या पुरस्कारासाठी शंभर गुणांची प्रश्नावली तयार केली होती. ऑनलाइन पद्धतीने ही माहिती शासनाला सादर करण्यात आली होती.

ठाणे : भारत सरकारच्यावतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२० ठाणे जिल्हा परिषदेच्या धसई ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. शहापूर तालुक्यातील ही ग्रामपंचायत आहे. 

राज्यातून पुरस्कृत झालेल्या १४ ग्रामपंचायत मध्ये ठाणे जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतचा समावेश झाला असून जिल्ह्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) डी.वाय.जाधव यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले. 

केंद्र सरकारने या पुरस्कारासाठी शंभर गुणांची प्रश्नावली तयार केली होती. ऑनलाइन पद्धतीने ही माहिती शासनाला सादर करण्यात आली होती. यामध्ये स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई.गव्हर्नरन्स, आदी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीच्या कामाचे स्वयं मूल्यमापन कमिटीने केले होते. धसई ग्रामपंचायतीने गावात या सगळ्या निकषांची पूर्तता केली असून हे गाव स्वयंपूर्ण गाव आहे. शहापूर तालुक्यात असणारे हे गाव  स्वातंत्र्यसेनानीचे गाव म्हणून ओळखले जाते. तीन महसुली गावे, दोन पाडे, व वस्ती अशी गावाची रचना आहे. गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सोई-सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. त्यामुळे यापूर्वी देखील गावाला हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव आदी पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. असे सरपंच मुकुंद पारथी, ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.पष्टे सांगतात. 

कोणताही पुरस्कार मिळणे ही केलेल्या कामाची पोहोच पावती असून आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील धसई सारख्या ऐतिहासिक ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही  कौतुकाची बाब असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली दिलीप पाटील यांनी सांगितले. तर राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ठाणे जिल्हा परिषदे च्या धसई ग्रामपंचायतीला जाहीर होणे ही आपल्या सगळयांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी गावातील नागरिक, सरपंच मुकुंद पारथी, उप सरपंच गुलाब भोईर, ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.पष्टे,, शहापूर गट विकास अधिकारी अशोक भवारी, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील या सगळ्यांच्या टीम वर्कचे हे फल आहे अशी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव होणे ही जिल्हावासीसाठी सार्थ अभिमानाची घटना आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती गतिमान होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेshahapurशहापूर