शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

'धसई' ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा 'पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार' जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:51 IST

राज्यातून पुरस्कृत झालेल्या १४ ग्रामपंचायत मध्ये ठाणे जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतचा समावेश झाला असून जिल्ह्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने या पुरस्कारासाठी शंभर गुणांची प्रश्नावली तयार केली होती. ऑनलाइन पद्धतीने ही माहिती शासनाला सादर करण्यात आली होती.

ठाणे : भारत सरकारच्यावतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२० ठाणे जिल्हा परिषदेच्या धसई ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. शहापूर तालुक्यातील ही ग्रामपंचायत आहे. 

राज्यातून पुरस्कृत झालेल्या १४ ग्रामपंचायत मध्ये ठाणे जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतचा समावेश झाला असून जिल्ह्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) डी.वाय.जाधव यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले. 

केंद्र सरकारने या पुरस्कारासाठी शंभर गुणांची प्रश्नावली तयार केली होती. ऑनलाइन पद्धतीने ही माहिती शासनाला सादर करण्यात आली होती. यामध्ये स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई.गव्हर्नरन्स, आदी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीच्या कामाचे स्वयं मूल्यमापन कमिटीने केले होते. धसई ग्रामपंचायतीने गावात या सगळ्या निकषांची पूर्तता केली असून हे गाव स्वयंपूर्ण गाव आहे. शहापूर तालुक्यात असणारे हे गाव  स्वातंत्र्यसेनानीचे गाव म्हणून ओळखले जाते. तीन महसुली गावे, दोन पाडे, व वस्ती अशी गावाची रचना आहे. गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सोई-सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. त्यामुळे यापूर्वी देखील गावाला हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव आदी पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. असे सरपंच मुकुंद पारथी, ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.पष्टे सांगतात. 

कोणताही पुरस्कार मिळणे ही केलेल्या कामाची पोहोच पावती असून आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील धसई सारख्या ऐतिहासिक ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही  कौतुकाची बाब असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली दिलीप पाटील यांनी सांगितले. तर राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ठाणे जिल्हा परिषदे च्या धसई ग्रामपंचायतीला जाहीर होणे ही आपल्या सगळयांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी गावातील नागरिक, सरपंच मुकुंद पारथी, उप सरपंच गुलाब भोईर, ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.पष्टे,, शहापूर गट विकास अधिकारी अशोक भवारी, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील या सगळ्यांच्या टीम वर्कचे हे फल आहे अशी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव होणे ही जिल्हावासीसाठी सार्थ अभिमानाची घटना आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती गतिमान होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.
 

टॅग्स :thaneठाणेshahapurशहापूर