शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना हवा मूलभूत समस्या सोडवणारा उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:24 IST

सर्वच पक्षांना केल्या १० कलमी सूचना

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे. यासाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनने पुढाकार घेतला असून या जाहीरनाम्यात ठाणेकरांनी मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.ठाणे सिटीझन फाउंडेशन ठाणेकरांसाठी विविध उपक्रम राबवत असते. या फाउंडेशनसोबत अनेक गृहनिर्माण संस्था जोडल्या गेल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या संस्थेने जाहीरनाम्यातून ठाणेकरांचे म्हणणे मांडले होते. या निवडणुकीतही त्यांनी ठाणे नागरिक जाहीरनामा तयार केला आहे. गेल्या १० दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे सिटीझन फाउंडेशनचे संस्थापक कॅसबर आॅगस्टिन यांनी पुढाकार घेऊन ठाणेकर नागरिकांच्या सूचना मागवल्या होत्या. या मोहिमेत जवळपास २०० हून अधिक नागरिकांनी आपल्या सूचना मांडल्या. या सूचनांच्या कॉमन मुद्द्यातून हा जाहीरनामा तयार करण्यात आला. यात नागरिकांनी पाणी, वाहतूककोंडी, सुरळीत वाहतूक सेवा अशा मुद्द्यांना हात घातला आहे. घोडबंदर रोड येथे नवीन स्टेशन उभारण्याची सूचना मांडली आहे. तसेच, आम्हाला असा उमेदवार हवा जो स्वच्छ प्रतिमेचा असेल आणि जो नागरिकांच्या सूचनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करेल, असेदेखील ठाणेकरांचे म्हणणे आहे. ठाणे शहर हे विकसित होत आहे, त्यामुळे शहरातील समस्या या त्वरित सोडवल्या जाव्यात, अशी आमची इच्छा आहे, असे आॅगस्टिन म्हणाले.ठाणे नागरिक जाहीरनाम्यातील मुद्देनागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आधुनिक अग्नी व्यवस्थापन सुविधा असावीमनोरंजन क्षेत्रांचा विचार व्हावाप्रत्येक प्रभागात वनक्षेत्र असावेहॉकर्स झोनची कठोर अंमलबजावणी व्हावीज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हावाठिकठिकाणी पार्किंग झोन असावेकोपरी / कळवा पूल त्वरित तयार करावापावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान अमलात आणावेशहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळेल, याचा विचार व्हावाशहर वाहतूककोंडीतून मुक्त करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे