शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

नगरसेवकांचे आलिशान दौरे रद्द करा, मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:32 IST

मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली लाखो रु पयांच्या निधीचा दुरु पयोग होत असल्याने जबाबदार नगरसेवक व निधी मंजूर करणा-या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगरसेवकांचे नैनिताल, दार्जिलिंग, कूर्ग अशा पर्यटन ठिकाणी तब्ब्ल तीन दौरे मंजूर करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर नगरसेवकांच्या उधळपट्टीवर विविध स्तरांतून टीकेची झोड सुरू झाली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी दौºयावर न जाण्याचा निर्णय जाहीर करत भाजपा व शिवसेना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह नरेंद्र पाटोळे, शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, प्रमोद देठे, सुशील कदम, गिरीश सोनी, सचिन पोपळे, मंगेश कांबळी, जितू शेणॉय, शेखर गजरे, नरेंद्र नाईक,अरविंद जैन, नितीन पाटील, मनीष कामटेकर, गणेश काकडे, नितीन अंडगळे, हरेश सुतार, त्रिलोक मोंगरे, रॉबर्ट डिसोझा, अभिनंदन चव्हाण, सूर्या पवार, स्वप्नील गुरव, रोशन पुजारी, प्रज्वल वेदपाठक, सुशांत तटकरे आदींच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.निधी नाही म्हणून विकासकामे रखडल्याचे सांगून नागरिकांवर घनकचरा शुल्क, पाणीपट्टी व मालमत्ता दरवाढ असा बोजा टाकून त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. करवाढीसह निधीअभावी पालिकारु ग्णालयात वैद्यकीय सुविधा व औषधे नाहीत, मच्छरांवरील औषधफवारणी बंद करत १८०कंत्राटी कामगार घरी बसवले. परिवहनव्यवस्था कोलमडली आहे, तर पालिका शाळांची दुरवस्था आहे. शहरातील नागरिक विविध समस्यांनी त्रासले असताना नगरसेवकांच्या अभ्यास दौºयाच्या नावावर केवळ आलिशान सहली झडत असल्याबद्दल नागरिक संतप्त असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.आतापर्यंतच्या दौºयांचा शहराला कुठलाही फायदा झालेला नसून उलट नगरसेवकांच्या दौºयातील मौजमजा व भांडणाच्या चर्चा रंगल्या आहेत.ठिय्या आंदोलनाचा इशाराअभ्यास दौºयात केवळ एक दिवसच तेथील पालिकेला भेट देण्याचे नाटक करून उर्वरित दिवस मात्र पर्यटनस्थळी मजा करण्यात घालवले जात असल्याने हा निधीचा दुरु पयोग आहे.त्यामुळे तो थांबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे स्पष्ट करत मनसेने गेल्या एक वर्षापासूनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMNSमनसे