शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नगरसेवकांचे आलिशान दौरे रद्द करा, मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:32 IST

मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली लाखो रु पयांच्या निधीचा दुरु पयोग होत असल्याने जबाबदार नगरसेवक व निधी मंजूर करणा-या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगरसेवकांचे नैनिताल, दार्जिलिंग, कूर्ग अशा पर्यटन ठिकाणी तब्ब्ल तीन दौरे मंजूर करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर नगरसेवकांच्या उधळपट्टीवर विविध स्तरांतून टीकेची झोड सुरू झाली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी दौºयावर न जाण्याचा निर्णय जाहीर करत भाजपा व शिवसेना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह नरेंद्र पाटोळे, शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, प्रमोद देठे, सुशील कदम, गिरीश सोनी, सचिन पोपळे, मंगेश कांबळी, जितू शेणॉय, शेखर गजरे, नरेंद्र नाईक,अरविंद जैन, नितीन पाटील, मनीष कामटेकर, गणेश काकडे, नितीन अंडगळे, हरेश सुतार, त्रिलोक मोंगरे, रॉबर्ट डिसोझा, अभिनंदन चव्हाण, सूर्या पवार, स्वप्नील गुरव, रोशन पुजारी, प्रज्वल वेदपाठक, सुशांत तटकरे आदींच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.निधी नाही म्हणून विकासकामे रखडल्याचे सांगून नागरिकांवर घनकचरा शुल्क, पाणीपट्टी व मालमत्ता दरवाढ असा बोजा टाकून त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. करवाढीसह निधीअभावी पालिकारु ग्णालयात वैद्यकीय सुविधा व औषधे नाहीत, मच्छरांवरील औषधफवारणी बंद करत १८०कंत्राटी कामगार घरी बसवले. परिवहनव्यवस्था कोलमडली आहे, तर पालिका शाळांची दुरवस्था आहे. शहरातील नागरिक विविध समस्यांनी त्रासले असताना नगरसेवकांच्या अभ्यास दौºयाच्या नावावर केवळ आलिशान सहली झडत असल्याबद्दल नागरिक संतप्त असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.आतापर्यंतच्या दौºयांचा शहराला कुठलाही फायदा झालेला नसून उलट नगरसेवकांच्या दौºयातील मौजमजा व भांडणाच्या चर्चा रंगल्या आहेत.ठिय्या आंदोलनाचा इशाराअभ्यास दौºयात केवळ एक दिवसच तेथील पालिकेला भेट देण्याचे नाटक करून उर्वरित दिवस मात्र पर्यटनस्थळी मजा करण्यात घालवले जात असल्याने हा निधीचा दुरु पयोग आहे.त्यामुळे तो थांबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे स्पष्ट करत मनसेने गेल्या एक वर्षापासूनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMNSमनसे