शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नगरसेवकांचे आलिशान दौरे रद्द करा, मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:32 IST

मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली लाखो रु पयांच्या निधीचा दुरु पयोग होत असल्याने जबाबदार नगरसेवक व निधी मंजूर करणा-या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगरसेवकांचे नैनिताल, दार्जिलिंग, कूर्ग अशा पर्यटन ठिकाणी तब्ब्ल तीन दौरे मंजूर करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर नगरसेवकांच्या उधळपट्टीवर विविध स्तरांतून टीकेची झोड सुरू झाली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी दौºयावर न जाण्याचा निर्णय जाहीर करत भाजपा व शिवसेना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह नरेंद्र पाटोळे, शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, प्रमोद देठे, सुशील कदम, गिरीश सोनी, सचिन पोपळे, मंगेश कांबळी, जितू शेणॉय, शेखर गजरे, नरेंद्र नाईक,अरविंद जैन, नितीन पाटील, मनीष कामटेकर, गणेश काकडे, नितीन अंडगळे, हरेश सुतार, त्रिलोक मोंगरे, रॉबर्ट डिसोझा, अभिनंदन चव्हाण, सूर्या पवार, स्वप्नील गुरव, रोशन पुजारी, प्रज्वल वेदपाठक, सुशांत तटकरे आदींच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.निधी नाही म्हणून विकासकामे रखडल्याचे सांगून नागरिकांवर घनकचरा शुल्क, पाणीपट्टी व मालमत्ता दरवाढ असा बोजा टाकून त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. करवाढीसह निधीअभावी पालिकारु ग्णालयात वैद्यकीय सुविधा व औषधे नाहीत, मच्छरांवरील औषधफवारणी बंद करत १८०कंत्राटी कामगार घरी बसवले. परिवहनव्यवस्था कोलमडली आहे, तर पालिका शाळांची दुरवस्था आहे. शहरातील नागरिक विविध समस्यांनी त्रासले असताना नगरसेवकांच्या अभ्यास दौºयाच्या नावावर केवळ आलिशान सहली झडत असल्याबद्दल नागरिक संतप्त असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.आतापर्यंतच्या दौºयांचा शहराला कुठलाही फायदा झालेला नसून उलट नगरसेवकांच्या दौºयातील मौजमजा व भांडणाच्या चर्चा रंगल्या आहेत.ठिय्या आंदोलनाचा इशाराअभ्यास दौºयात केवळ एक दिवसच तेथील पालिकेला भेट देण्याचे नाटक करून उर्वरित दिवस मात्र पर्यटनस्थळी मजा करण्यात घालवले जात असल्याने हा निधीचा दुरु पयोग आहे.त्यामुळे तो थांबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे स्पष्ट करत मनसेने गेल्या एक वर्षापासूनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMNSमनसे