शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

बार, हॉटेल्स ७ वाजताच बंद केले जात असल्याने व्यावसायिक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:17 IST

मे महिन्याच्या शेवटी शासनाने परमिट रूमधारकांना पार्सलची मुभा दिली असली तरी काम सोडून परगावी गेलेले कामगार, धूळखात बंद पडलेली खाद्य सामग्री, यामुळे पूर्णत: कोलमडून पडलेल्या व्यावसायिकांनी अल्प प्रतिसाद दिला आहे.

पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून बंद असलेले परमिट रुम, बार आणि हॉटेल्स उघडण्यात आली असली तरी संध्याकाळी ७ वाजताच बार बंद केले जात असल्याने व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.पालघर जिल्ह्यात एकूण ४१५ बार आणि परमिट रूम असून जिल्ह्यात मद्यविक्रीतून सुमारे १६३ कोटींची उलाढाल होते. मात्र मार्चपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बार, परमिट रूम, बिअर शॉप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांच्या तोट्यासह ही यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. मे महिन्याच्या शेवटी शासनाने परमिट रूमधारकांना पार्सलची मुभा दिली असली तरी काम सोडून परगावी गेलेले कामगार, धूळखात बंद पडलेली खाद्य सामग्री, यामुळे पूर्णत: कोलमडून पडलेल्या व्यावसायिकांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील ४१० परमिट रूमपैकी फक्त १४९ परमिट रूमधारकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.राज्य शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत महसूल, वन आणि मदत पुनर्वसन विभागाने ३० सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात ५ आॅक्टोबरपासून बार आणि परमिट रूमच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्याची परवानगी दिली होती. तर राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या सहसंचालकांनी बुधवारी, ७ आॅक्टोबर रोजी पत्र काढून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेपर्यंत बार आणि परमीट रूम उघडे ठेवण्यासंदर्भात आदेश पारित केले होते. मात्र पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित न केल्याने संध्याकाळी ७ वाजता उत्पादन शुल्क विभागाकडून बार, परमिट रूम बंद केले जात होते.वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात बार आणि परमिट रूमधारकास ७ लाख ३५ हजार रुपये, पालघर नगर परिक्षेत्रात ८० हजार, डहाणू नगरपरिषद परिषद क्षेत्रात ८६ हजार आणि ग्रामपंचायत क्षेत्रात ५७ हजार रुपये लायसन्स फी, राज्य उत्पादन फी भरावी लागते.संध्याकाळी ७ वाजताच बार आणि परमिट रूम बंद केल्यास एवधी हजारो रुपयांची फी भरणार कुठून? असा प्रश्न बार असोसिएशनचे कार्याध्यक्ष भुजंग शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा बार आणि परमिट रूम बंद ठेवली तरी चालतील, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे.या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांशी बैठक आयोजित केली असून व्यावसायिकांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहील, याबाबत आदेश काढले जातील.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर