शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

४० हजार झाडांवर बुलेट ट्रेनकरिता कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:22 AM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत.

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्रातील ८३ हेक्टरहून अधिक वनक्षेत्र प्रकल्पाकरिता वापरले जाणार आहे, तर गुजरातमधील केवळ सहा हेक्टर वनक्षेत्र बाधित होत आहे. १८ हेक्टर जमिनीवरील कांदळवन या प्रकल्पामुळे नष्ट केले जाणार आहे.या प्रकल्पाच्या मार्गात नद्या, खाड्या आणि ३४ तळी असून त्यापैकी काहींचे मार्ग बदलण्यात येतील, तर काही बुजवण्यात येणार आहेत किंवा कसे ते स्पष्ट नाही. एवढे सारे होऊनही पर्यावरणावर या प्रकल्पाचा सुतराम परिणाम होणार नाही, असा दावा संबंधित अधिकारी करत आहेत.बुलेट ट्रेनचा मार्ग हा ५०८.१७ किमीचा असणार असून सध्या मुंबई-अहमदाबाद प्रवासाकरिता लागणाºया वेळेपेक्षा दोन तास कमी वेळात ही ट्रेन अंतर कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गातील सर्वात लांबीचा बोगदा ठाण्यात असणार आहे. तो पाण्याखाली ३० मीटर खोल असेल व त्याचे अंतर तब्बल २०.७१ किमी असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण २९ गावे बाधित होणार असल्याची माहिती पर्यावरण अहवालात नमूद केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे ड्रीम प्रोजेक्ट पाच वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. ठाणे खाडीत पाहुणे म्हणून येणाºया फ्लेमिंगोंचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा दावा पर्यावरणवादी करत असले, तरी या अहवालात मात्र या पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्ष्यांना बुलेट ट्रेनपासून धोका होऊ नये, यासाठी योजना आखण्यात आली आहे.प्रकल्पाकरिता २०७.७७ हेक्टर भूसंपादन केले जाणार असून त्यापैकी ८१.५१ हेक्टर खाजगी जमीन, देखरेख आगार १२६.२६ हेक्टर वनप्रदेश फेरफार १७.३६५८ हेक्टरचे असणार आहे. तर, यामध्ये वनक्षेत्र हे ८३.५५ हेक्टर एवढे असणार असून यामध्ये महाराष्टÑातील तब्बल ७७.४५ हेक्टरचा समावेश आहे. गुजरातमधील केवळ ६.१० हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश असणार आहे. ठाण्यातील वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने याठिकाणी फेरफार करावा लागणार आहे. परंतु, तो कसा केला जाणार, कुठे केला जाणार, याचा अहवालात उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रकल्पाच्या जमिनीतील माती सुपिक आहे, असेही नमूद केले आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन