शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

इमारत दुर्घटना : भाजीविक्रेत्या महिलेने दाखवली माणुसकी; हातगाड्यांवर वाहिले लोकांचे सामान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 1:27 AM

कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

- अनिकेत घमंडी  डोंबिवली : कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.पहाटे पावणेतीन वाजता इमारत पडल्यानंतर घरांमधून जे सामान मिळेल ते तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी रहिवाशांची धावपळ सुरू होती. पण एवढ्या पहाटे टेम्पो, मोठी वाहने कशी मिळणार, या चिंतेने नागरिकांना ग्रासले होते. त्याची कल्पना येताच वृंदा वाट यांनी गुरुवारी व्यवसाय करायचा नाही, भाज्या ठेवण्यासाठी ज्या हातगाड्या होत्या, त्या नुकसानग्रस्तांच्या मदतकार्याला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.त्या म्हणाल्या की, एरव्ही माझ्याकडून वर्षानुवर्षे या नागरिकांनी भाजी नेली आहे, या सगळ्यांची मुले माझ्यासमोर मोठी झाली. संकटकाळात मदत करण्याची हीच ती संधी होती. रहिवासी पवन पाटील यांनी समस्या सांगितल्यावर मी दोन्ही हातगाड्या तेथे पाठवल्या. रस्त्यावर पडलेलं सामान युवकांनी ठेवले आणि मदतकार्याला वेग आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.एवढेच नव्हे, तर इमारत पडल्यानंतर तातडीने महिला, लहान मुलांना त्यांच्या रिकाम्या असलेल्या दोन घरांमध्ये सकाळपर्यंत थांबा असेही वृंदा यांनी सुचवले. ज्यांना कुठेही घर मिळत नसेल, त्यांनी आमच्या रिकाम्या घरात राहायला जावे, भाड्याचे नंतर बघू, नाही जमले तर दोन महिने भाडे देऊ नका, पण घाबरू नका असे सांगून त्यांनी रहिवाशांना दिलासा दिला. घराचे, सामानाचे नुकसान झाले, पण ते भरुन काढता येईल. संकटांना धैर्याने सामोरे जा, असे सांगून त्यांनी महिलांना धीर दिला. शुक्रवारी सकाळपर्यंत भाजीची गाडी त्यांनी मदतकार्याच्या ठिकाणी आणली होती. सर्व आटोपल्यावर व्यवसायाला सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी कुटुंबीयांना दिल्या होत्या.माजी नगरसेवक संजय पावशे यांनीही काही दुर्घटनाग्रस्त भाडेकरूंना राहण्यासाठी तत्काळ घर उपलब्ध करून दिलासा दिला. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळीच अग्निशमन दल, विष्णुनगर पोलीस आणि समाजसेवकांसह इतरांनी सामाजिक बांधीलकीतून मदतकार्यासाठी तातडीने धाव घेतली. संजय पावशे यांनी टेम्पो, रिक्षा उपलब्ध करून देत रहिवाशांना धीर दिला. 

ऐन सणासुदीच्या दिवसात इमारतीचा भाग कोसळल्याने रहिवाशांवर मोठे संकट कोसळले आहे. दिवाळी तोंडावर आली असताना त्यांचा हक्काचा निवारा हिरावला गेला आहे. त्यामुळे त्यांचे संकट खूप मोठे आहे. माणुसकीच्या नात्यातून मी करीत असलेली मदत त्यांच्या संकटापुढे काहीच नाही, असा भावना वृंदा वाट यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :dombivaliडोंबिवली